8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'बंपर' भेट!; ८वा वेतन आयोग अखेर मंजूर; 'या' तारखेपासून होणार लागू, किमान वेतनात होणार 'इतकी' वाढ!

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अखेर आज ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि ६९ लाख निवृत्तीवेतन धारकांना (पेन्शनधारक) मोठा दिलासा मिळणार आहे.


केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. गेल्या १० महिन्यांपासून आयोगाच्या स्थापनेची मागणी होत होती. अखेर सरकारने त्याची स्थापना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रंजन प्रकाश देसाई हे या आयोगाचे अध्यक्ष असतील. आयोगात एक अध्यक्ष, एक अंशकालिक सदस्य आणि एक सदस्य सचिव यांचा समावेश असेल. आयोग पुढील १८ महिन्यांत (दीड वर्षात) आपल्या शिफारसी सादर करेल. या आयोगाच्या शिफारसी १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे.



किमान वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता


यावेळी फिटमेंट फॅक्टरनुसार वेतनवाढ दिली जाणार आहे. सध्या २.२८ असलेला फिटमेंट फॅक्टर ३.०० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, कर्मचाऱ्यांचे किमान वेतन १८,००० रुपयांवरून २१,६०० रुपये होऊ शकते, म्हणजे मासिक वेतनात ३४.१ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.


तसेच, किमान पेन्शनमध्येही वाढ होऊन ती २०,५०० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. या वाढीमुळे सरकारी तिजोरीवर मोठा बोजा पडणार असला तरी, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून ५८ लाख नावे वगळली

१२ लाखांहून अधिक मतदार ‘बेपत्ता’ असल्याचे विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत स्पष्ट कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये

भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा! इथियोपियाच्या प्रतिष्ठीत ‘ग्रेट ऑनर निशान’ने पंतप्रधान मोदी सन्मानित

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपिया देशाने ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित केले आहे. मोदींना

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा