8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'बंपर' भेट!; ८वा वेतन आयोग अखेर मंजूर; 'या' तारखेपासून होणार लागू, किमान वेतनात होणार 'इतकी' वाढ!

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अखेर आज ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि ६९ लाख निवृत्तीवेतन धारकांना (पेन्शनधारक) मोठा दिलासा मिळणार आहे.


केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. गेल्या १० महिन्यांपासून आयोगाच्या स्थापनेची मागणी होत होती. अखेर सरकारने त्याची स्थापना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रंजन प्रकाश देसाई हे या आयोगाचे अध्यक्ष असतील. आयोगात एक अध्यक्ष, एक अंशकालिक सदस्य आणि एक सदस्य सचिव यांचा समावेश असेल. आयोग पुढील १८ महिन्यांत (दीड वर्षात) आपल्या शिफारसी सादर करेल. या आयोगाच्या शिफारसी १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे.



किमान वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता


यावेळी फिटमेंट फॅक्टरनुसार वेतनवाढ दिली जाणार आहे. सध्या २.२८ असलेला फिटमेंट फॅक्टर ३.०० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, कर्मचाऱ्यांचे किमान वेतन १८,००० रुपयांवरून २१,६०० रुपये होऊ शकते, म्हणजे मासिक वेतनात ३४.१ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.


तसेच, किमान पेन्शनमध्येही वाढ होऊन ती २०,५०० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. या वाढीमुळे सरकारी तिजोरीवर मोठा बोजा पडणार असला तरी, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल; लष्करप्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावर्ती तणावाबाबत गेले काही महिने सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे लष्करप्रमुख जनरल

फाशीच्या शिक्षेवर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांची प्रतिक्रिया

ढाका - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना युनुस सरकारने स्थापने केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हे

बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे

Mumbai CNG Cut : मुंबईत CNGचा मोठा तुटवडा, रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प; मुंबईकरांचे प्रवास नियोजन कोलमडण्याची शक्यता

वडाळ्यातील गेल पाईपलाईन बिघाडामुळे मुंबईत सीएनजी टंचाई मुंबई : वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य

लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला अटक! कोण आहे आमिर रशीद अली?

दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश

केएफसी आणि मॅकडोनाल्डसारखे फूड ब्रॅण्ड रेल्वेस्थानकांवर उघडणार

रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात केला मोठा बदल नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात एक मोठा