अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा संपन्न! राजकारण सक्रीय असलेल्या कुटुंबाची होणार थोरली सून

मुंबई: बिग बॉस मराठी ४ मधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. शिवसेनेचे नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत तेजस्विनीचा साखरपुडा झाला आहे. तेजस्विनी आणि समाधान सरवणकर यांच्या नात्याबद्दल तेजस्विनीने याआधी समाजमाध्यमांवर कोणतीच पोस्ट केली नव्हती. मात्र आता साखरपुड्याचे फोटो समाजमाध्यमांवर टाकल्यामुळे तेजस्विनीच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.



तेजस्विनीने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तर समाधान सरवणकर हे शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत. सदा सरवणकरांप्रमाणे त्यांचे ज्येष्ठ पुत्र समाधान सरवणकर सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे कलाकार विश्वातील अभिनेत्री आता राजकीय घराण्याची सून होणार आहे.




तेजस्विनीच्या साखरपुड्याच्या फोटोंमुळे आता ती लग्नबंधनात कधी अडकणार याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. साखरपुड्यासाठी तेजस्विनी आणि समाधान सरवणकर यांनी पारंपरिक लूक केला होता. लाल रंगाची डिझायनर साडी, गळ्यात मोठा हार, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा या लूकमध्ये तेजस्विनी अतिशय सुंदर दिसत होती. तर समाधान सरवणकर यांनी मोती रंगाचा जोधपुरी सूट घातला होता. त्यांच्या साखरपुड्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

Comments
Add Comment

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी! १५९ धावांची खेळी करून रहाणेचं मोठं स्टेटमेंट; रोहित-विराटचा दाखला देत टीम इंडियात पुनरागमनाचा ठोकला दावा

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy 2025-26) हंगामाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई संघ (Mumbai Team) छत्तीसगड (Chhattisgarh) विरुद्ध आपला

Kabutarkhana : 'गरज पडल्यास शस्त्र'...कबुतरखान्यांवरील बंदीवरून जैन समाज पुन्हा आक्रमक; जैन मुनींचा थेट 'आमरण उपोषणाचा' इशारा

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला आहे. या

बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक १८६४ ला भावपूर्ण निरोप

मुंबई  :  मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्ट उपक्रमातील शेवटची मोठ्या आकाराची JNNURM बसगाडी

मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेद्वारे २८ ऑक्टोबर २०२५

आजपासून मुंबईत 'इंडिया मेरीटाईम सप्ताह', केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : शंभराहून अधिक देशातील एक लाखापेक्षा अधिक प्रतिनिधी, ५०० प्रदर्शक, २०० पेक्षा अधिक तज्ज्ञ

दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी