माजी जिल्हा संपर्कप्रमुख भाजपच्या वाटेवर! कोकणात उबाठासाठी निर्माण झाली मोठी घळ

रायगड: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सर्वत्र सुरू आहे. यासाठी सर्व पक्ष मैदानात उतरले असून शिवसेना उबाठा गटाचे खेळाडू मॅचपूर्वीच मैदान सोडत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील उबाठा गटाच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. महत्त्वाचे म्हणजे उबाठासाठी बालेकिल्ला असलेल्या कोकणातही आता महायुतीमधील इनकमिंग वाढताना दिसत आहे. ज्यात रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांनीही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.



२०२४ च्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर महाविकास आघाडीतील अनेकजणांनी महायुतीची वाट धरली. काही दिवसांपूर्वी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान उबाठा गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड भाजपमध्ये पक्षांतर करणार असल्याचे निश्चित झाले आहे. मंगळवार, २८ ऑक्‍टोबर रोजी प्रदेशाध्‍यक्ष रविंद्र चव्‍हाण यांच्‍या उपस्थितीत ते हातात कमळ घेणार आहेत.




नागेंद्र राठोड यांनी काही दिवसांपूर्वी रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. उबाठा गटातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून राठोड यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राठोड कोणती भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. आता राठोड यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतल्याने आगामी निवडणुकीमध्ये उबाठा गटासाठी रायगडमध्ये मोठा खड्डा पडणार असल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

Raghav Chaddha : राघव चड्ढा यांच्यासह ‘आप‘च्या 'त्या' ७ खासदारांच्या भाजपमधील विलीनीकरणास मंजुरी

- उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी दिली मंजुरी भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यसभेतील आपले स्थान आणखी मजबूत

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Raghav Chadha : ‘आप’ने आत्मचिंतन करण्याची गरज - राघव चड्ढा यांचा टोला

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) सध्या अंतर्गत नाराजी आणि वादांच्या भोवऱ्यात अडकला असून, पक्षाने आत्मचिंतन

Chitra Wagh : 'कितीही विरोध झाला तरी भाजपा महिलांना आरक्षण मिळवून देणारच'

मुंबई : महिला आरक्षणाला विरोध करून लाखो महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणाऱ्या विरोधी पक्षांना या लाखो