भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची शिफारस

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्यानंतरचे वरिष्ठ न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली आहे. सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. याआधीच नियम आणि परंपरेला अनुसरुन सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून एका वरिष्ठ न्यायमूर्तींच्या नावाची शिफारस केली आहे. ही शिफारस सरन्यायाधीशांनी केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाला पाठवली आहे. आता देशाच्या ५३ व्या सरन्यायाधीशांच्या निवडीची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे.



याआधी भारताचे ५१ वे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाले आणि ५२ वे सरन्यायाधीश म्हणून बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी सूत्रं हाती घेतली होती. गवई यांनी १४ मे २०२५ रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली होती. ते २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर सूर्यकांत हे देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रं हाती घेण्याची शक्यता आहे. सूर्यकांत हे ९ फेब्रुवारी २०२७ रोजी निवृत्त होणार आहेत.


भारतात सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांसाठी निवृत्तीचे वय ६५ वर्ष हे आहे. सरन्यायाधीश तसेच सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायमूर्ती यांना हा नियम लागू आहे. नियम आणि परंपरेला अनुसरुन कार्यरत सरन्यायाधीश हे निवृत्त होण्याआधी पुढील सरन्यायाधीश म्हणून एका नावाची शिफारस करतात. ही शिफारस सरन्यायाधीशांनी केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाला पाठवायची असते. यानंतर सरन्यायाधीशांच्या निवडीची कायदेशीर प्रक्रिया सुरू होते.

Comments
Add Comment

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला