कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ उडाली. शंकर गल्लीतील १७ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २०५ च्या हॉलमध्ये आग लागली होती. सकाळी सुमारे ७:४५ वाजता आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने (एमएफबी) तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि फक्त २० मिनिटांत, म्हणजेच सकाळी ८:०५ वाजता आग आटोक्यात आणली.


अग्निशमन दलाच्या जवानांनी जिन्याचा वापर करून इमारतीतील आठ रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. यामध्ये दोन पुरुष, तीन महिला आणि तीन मुलांचा समावेश होता. सुटका करण्यात आलेल्यांपैकी चिंतन अभय कोठारी (४५), ख्याती चिंतन कोठारी (४२) आणि ज्योती अभय कोठारी (६६) या तिघांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने मालाड येथील तुंगा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, असे रुग्णालय प्रशासनाने कळवले. उर्वरित पाच जणांना किरकोळ दुखापती झाल्या असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. या आगीत हॉलमधील इलेक्ट्रिक वायरिंग, फर्निचर आणि लाकडी वस्तूंचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.



जोगेश्वरीतील बहुमजली व्यावसायिक इमारतीला आग


मुंबईत याच आठवड्यात दुसरी मोठी आग जोगेश्वरी उपनगरातील जेएनएस बिझनेस सेंटरमध्ये लागली. गुरुवारी सकाळी १०.५० च्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे तब्बल १७ जणांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या सर्वांना वैद्यकीय मदत द्यावी लागली. जोगश्वरीच्या १३ मजली व्यावसायिक इमारतीच्या ९व्या ते १३व्या मजल्यांपर्यंत ज्वाळा पसरल्या होत्या. चौथ्या मजल्यापासून १३व्या मजल्यापर्यंत विद्युत डक्टमधून धूर आणि ज्वाळा पसरल्याने परिस्थिती गंभीर बनली.


या ठिकाणी १२ अग्निशमन गाड्या आणि विविध यंत्रणा तैनात करून आग विझवण्याचे काम हाती घेण्यात आले. अग्निशमन दलाने हायड्रॉलिक शिडीच्या मदतीने दोन महिलांसह २७ जणांना सुरक्षित बाहेर काढले. तरीही दाट धुरामुळे श्वास घेता न आल्याने १७ जणांचा त्रास झाला. उर्वरित नऊ जणांवर एचबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मुंबईत काही दिवसांपासून सलग लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही घटनांमधून सुरक्षाव्यवस्थेच्या तपासणीची आणि विद्युत यंत्रणांच्या देखभालीची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment

पॅनकार्डच्या नियमांमध्ये बदल, १ एप्रिलपासून 'हे' नवे नियम होणार लागू

मुंबई : भारताचे आर्थिक वर्ष हे १ एप्रिल ते ३१ मार्च पर्यंत असते. उद्यापासून नव आर्थिक वर्ष सुरु होतंय. आणि

Mumbai Local Mega block Update : मुंबईत अचानक 'इतक्या' लोकल फेऱ्या झाल्या रद्द, आता शेवटचीही गाडी सुटणार 'या' वेळेवर

मुंबई : मुंबईत सध्या लोकलचे वेळापत्रक हे बिघडलेलं दिसत आहे. अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत आणि बऱ्याच गाड्या

माजी खासदार राहुल शेवाळे बॉक्सिंगच्या रिंगणात; महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

मुंबई: बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) च्या निरीक्षकांच्या उपस्थितीत मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या

Corporator Tejinder Singh Tiwana : जनसेवेचा आदर्श! नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांचा मोठा निर्णय

- ५ वर्षांचे संपूर्ण वेतन महापौर निधीसाठी मुंबई : जनहितासाठी एक प्रेरणादायी पाऊल उचलत नगरसेवक तेजिंदर सिंग

Narhari Zirwal : नरहरी झिरवळ व्हिडिओ प्रकरणात पहिली कारवाई; ट्रान्सजेंडरच्या भावावर मुंबईत गुन्हा दाखल, मोठी माहिती समोर

मुंबई : राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ एका नवीन वादात सापडले आहेत. त्यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या

मेट्रो वूमन, कोस्टल वूमन ते पहिल्या मुंबई महापालिका आयुक्त

मुंबई: सनदी अधिकारी आश्विनी भिडे यांचे नाव उच्चारताच आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतात ते म्हणजे मेट्रो व्हूमन.