कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ उडाली. शंकर गल्लीतील १७ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २०५ च्या हॉलमध्ये आग लागली होती. सकाळी सुमारे ७:४५ वाजता आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने (एमएफबी) तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि फक्त २० मिनिटांत, म्हणजेच सकाळी ८:०५ वाजता आग आटोक्यात आणली.


अग्निशमन दलाच्या जवानांनी जिन्याचा वापर करून इमारतीतील आठ रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. यामध्ये दोन पुरुष, तीन महिला आणि तीन मुलांचा समावेश होता. सुटका करण्यात आलेल्यांपैकी चिंतन अभय कोठारी (४५), ख्याती चिंतन कोठारी (४२) आणि ज्योती अभय कोठारी (६६) या तिघांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने मालाड येथील तुंगा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, असे रुग्णालय प्रशासनाने कळवले. उर्वरित पाच जणांना किरकोळ दुखापती झाल्या असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. या आगीत हॉलमधील इलेक्ट्रिक वायरिंग, फर्निचर आणि लाकडी वस्तूंचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.



जोगेश्वरीतील बहुमजली व्यावसायिक इमारतीला आग


मुंबईत याच आठवड्यात दुसरी मोठी आग जोगेश्वरी उपनगरातील जेएनएस बिझनेस सेंटरमध्ये लागली. गुरुवारी सकाळी १०.५० च्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे तब्बल १७ जणांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या सर्वांना वैद्यकीय मदत द्यावी लागली. जोगश्वरीच्या १३ मजली व्यावसायिक इमारतीच्या ९व्या ते १३व्या मजल्यांपर्यंत ज्वाळा पसरल्या होत्या. चौथ्या मजल्यापासून १३व्या मजल्यापर्यंत विद्युत डक्टमधून धूर आणि ज्वाळा पसरल्याने परिस्थिती गंभीर बनली.


या ठिकाणी १२ अग्निशमन गाड्या आणि विविध यंत्रणा तैनात करून आग विझवण्याचे काम हाती घेण्यात आले. अग्निशमन दलाने हायड्रॉलिक शिडीच्या मदतीने दोन महिलांसह २७ जणांना सुरक्षित बाहेर काढले. तरीही दाट धुरामुळे श्वास घेता न आल्याने १७ जणांचा त्रास झाला. उर्वरित नऊ जणांवर एचबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मुंबईत काही दिवसांपासून सलग लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही घटनांमधून सुरक्षाव्यवस्थेच्या तपासणीची आणि विद्युत यंत्रणांच्या देखभालीची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित

'ऊर्जा क्षेत्राला सक्षम करण्यासाठी कालबद्धरित्या प्रकल्पांची अंमलबजावणी करा'

मुंबई : राज्यात ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उदंचन जलविद्युत

मच्छिमार आणि महिला कामगारांसाठी विश्रामगृह तातडीने खुले करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : ससून डॉक येथील मच्छिमार, महिला कामगार आणि बोटधारकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन