चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची हत्या त्यांच्या स्वपत्नीने म्हणजे चैताली भोईर (वय २८) यांनी केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजकीय महत्वकांक्षा आणि चारित्र्याच्या संशयामुळे नकुल भोईर यांची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. चैताली भोईर या नगरसेवक बनण्याचे स्वप्न पाहत होते. तर नकुल भोईर संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शहीद भगतसिंग परिषदेचे संस्थापक अध्यक्ष होते, त्यांचा जनसंपर्क दांडगा होता.



मिळालेल्या माहितीनुसार, नकुल आपल्या पत्नी चैतालीवर वारंवार संशय घेत असे, ज्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होत होती. चैताली महत्त्वाकांक्षी होत्या आणि त्यांना राजकारणात प्रवेश करायचा होता. काल मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा एकदा चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन, रागाच्या भरात चैतालीने पती नकुलच्या गळ्याभोवती ओढणीचा फास आवळून त्यांची हत्या केली. ही घटना घडली तेव्हा त्यांची दोन आणि पाच वर्षांची मुले आतल्या खोलीत झोपलेली होती. दरम्यान पोलिसांनी चैताली भोईरला अटक केली असून, कौटुंबिक रागातूनच हे कृत्य घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Comments
Add Comment

‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर

मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार

सरत्या वर्षाला द्या निरोप , प्रियजनांना द्या २०२६ नववर्षाच्या हटके शुभेच्छा!

आज संपूर्ण जगभरात मध्यरात्री सर्वजण सरत्या वर्षाला निरोप दिला जातो. २०२६ नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. सरत्या

‘हॅप्पी न्यू इयर’चा एक मेसेज करू शकतो बँक खाते रिकामे

सफाळे पोलिसांकडून सायबर स्कॅमबाबत हाय अलर्ट सफाळे : नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र असतानाच, सायबर

भाजप जिल्हाध्यक्षांसह मंडळ अध्यक्षांना संधी

संघटनातील अनेक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती