चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची हत्या त्यांच्या स्वपत्नीने म्हणजे चैताली भोईर (वय २८) यांनी केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजकीय महत्वकांक्षा आणि चारित्र्याच्या संशयामुळे नकुल भोईर यांची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. चैताली भोईर या नगरसेवक बनण्याचे स्वप्न पाहत होते. तर नकुल भोईर संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शहीद भगतसिंग परिषदेचे संस्थापक अध्यक्ष होते, त्यांचा जनसंपर्क दांडगा होता.



मिळालेल्या माहितीनुसार, नकुल आपल्या पत्नी चैतालीवर वारंवार संशय घेत असे, ज्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होत होती. चैताली महत्त्वाकांक्षी होत्या आणि त्यांना राजकारणात प्रवेश करायचा होता. काल मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा एकदा चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन, रागाच्या भरात चैतालीने पती नकुलच्या गळ्याभोवती ओढणीचा फास आवळून त्यांची हत्या केली. ही घटना घडली तेव्हा त्यांची दोन आणि पाच वर्षांची मुले आतल्या खोलीत झोपलेली होती. दरम्यान पोलिसांनी चैताली भोईरला अटक केली असून, कौटुंबिक रागातूनच हे कृत्य घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या