फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित


नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक मोठा बदल केला आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० च्या अनुषंगाने, इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी किमान वय ६+ वर्षे निश्चित केले आहे. हा नवीन नियम २०२६-२७ सत्रापासून राजधानीतील सर्व सरकारी, सरकारी अनुदानित आणि मान्यताप्राप्त खासगी शाळांमध्ये लागू केला जाईल. शिक्षण संचालनालयाने (डीओई) जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पायाभूत टप्प्यासाठीची रचना आणि प्रवेश वयोमर्यादा टप्प्याटप्प्याने सुधारित केली जाईल.


नवीन वयोमर्यादा खालीलप्रमाणे असेल (३१ मार्चच्या वयानुसार):


ज्युनिअर केजी (बालवाडी-२/प्री-स्कूल-२): ४ ते ५ वर्षे
सिनिअर केजी (बालवाडी-३/प्री-स्कूल-३): ५ ते ६ वर्षे
इयत्ता पहिली : ६ ते ७ वर्षे
तथापि, शाळा प्रमुखांना किमान आणि कमाल वयोमर्यादा एक महिन्यापर्यंत शिथिल करण्याचा अधिकार असेल. चालू सत्रातील विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होणार नाही. परिपत्रकात असे स्पष्ट केले आहे की, नवीन वयोमर्यादा २०२५-२६ सत्रातील विद्यार्थ्यांवर होणार नाही. विद्यमान नर्सरी, केजी आणि पहिली इयत्तेतील विद्यार्थी पुढील सत्रात विद्यमान रचनेनुसार सुरू राहतील.


नवीन रचना २०२७-२८ पासून लागू
२०२७-२८ पासून नवीन शैक्षणिक रचना पूर्णपणे लागू केली जाईल, जेव्हा ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजी वर्ग सुरू होतील. या वर्गांमध्ये प्रवेश नवीन वयोमर्यादेनुसार असेल. मागील शाळेतून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूट
मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण झालेल्या आणि त्यांचे शाळा सोडल्याचा दाखला (एसएलसी) आणि गुणपत्रिका असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी वयोमर्यादेतून सूट दिली जाईल.
शिक्षण संचालनालयाने सर्व शाळा प्रमुखांना या बदलांबद्दल पालकांना स्पष्टपणे माहिती देण्याचे आणि नवीन वयोमर्यादेचे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव