फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित


नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक मोठा बदल केला आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० च्या अनुषंगाने, इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी किमान वय ६+ वर्षे निश्चित केले आहे. हा नवीन नियम २०२६-२७ सत्रापासून राजधानीतील सर्व सरकारी, सरकारी अनुदानित आणि मान्यताप्राप्त खासगी शाळांमध्ये लागू केला जाईल. शिक्षण संचालनालयाने (डीओई) जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पायाभूत टप्प्यासाठीची रचना आणि प्रवेश वयोमर्यादा टप्प्याटप्प्याने सुधारित केली जाईल.


नवीन वयोमर्यादा खालीलप्रमाणे असेल (३१ मार्चच्या वयानुसार):


ज्युनिअर केजी (बालवाडी-२/प्री-स्कूल-२): ४ ते ५ वर्षे
सिनिअर केजी (बालवाडी-३/प्री-स्कूल-३): ५ ते ६ वर्षे
इयत्ता पहिली : ६ ते ७ वर्षे
तथापि, शाळा प्रमुखांना किमान आणि कमाल वयोमर्यादा एक महिन्यापर्यंत शिथिल करण्याचा अधिकार असेल. चालू सत्रातील विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होणार नाही. परिपत्रकात असे स्पष्ट केले आहे की, नवीन वयोमर्यादा २०२५-२६ सत्रातील विद्यार्थ्यांवर होणार नाही. विद्यमान नर्सरी, केजी आणि पहिली इयत्तेतील विद्यार्थी पुढील सत्रात विद्यमान रचनेनुसार सुरू राहतील.


नवीन रचना २०२७-२८ पासून लागू
२०२७-२८ पासून नवीन शैक्षणिक रचना पूर्णपणे लागू केली जाईल, जेव्हा ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजी वर्ग सुरू होतील. या वर्गांमध्ये प्रवेश नवीन वयोमर्यादेनुसार असेल. मागील शाळेतून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूट
मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण झालेल्या आणि त्यांचे शाळा सोडल्याचा दाखला (एसएलसी) आणि गुणपत्रिका असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी वयोमर्यादेतून सूट दिली जाईल.
शिक्षण संचालनालयाने सर्व शाळा प्रमुखांना या बदलांबद्दल पालकांना स्पष्टपणे माहिती देण्याचे आणि नवीन वयोमर्यादेचे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे

Mumbai CNG Cut : मुंबईत CNGचा मोठा तुटवडा, रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प; मुंबईकरांचे प्रवास नियोजन कोलमडण्याची शक्यता

वडाळ्यातील गेल पाईपलाईन बिघाडामुळे मुंबईत सीएनजी टंचाई मुंबई : वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य

लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला अटक! कोण आहे आमिर रशीद अली?

दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश

केएफसी आणि मॅकडोनाल्डसारखे फूड ब्रॅण्ड रेल्वेस्थानकांवर उघडणार

रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात केला मोठा बदल नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात एक मोठा

पुन्हा नितीशकुमारच मुख्यमंत्री

बिहारमध्ये रालोआचे मंत्रिमंडळ स्थापनेबाबत एकमत; भाजपला जास्त प्रतिनिधित्व नवी दिल्ली : बिहार विधानसभा

नवी दिल्ली लाल किल्ला कार स्फोट प्रकरणात तपासात नवे धक्कादायक खुलासे!

नवी दिल्ली : ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी घडलेल्या कार स्फोट प्रकरणात तपासाला मोठा वळण आले आहे.