फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित


नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक मोठा बदल केला आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० च्या अनुषंगाने, इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी किमान वय ६+ वर्षे निश्चित केले आहे. हा नवीन नियम २०२६-२७ सत्रापासून राजधानीतील सर्व सरकारी, सरकारी अनुदानित आणि मान्यताप्राप्त खासगी शाळांमध्ये लागू केला जाईल. शिक्षण संचालनालयाने (डीओई) जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पायाभूत टप्प्यासाठीची रचना आणि प्रवेश वयोमर्यादा टप्प्याटप्प्याने सुधारित केली जाईल.


नवीन वयोमर्यादा खालीलप्रमाणे असेल (३१ मार्चच्या वयानुसार):


ज्युनिअर केजी (बालवाडी-२/प्री-स्कूल-२): ४ ते ५ वर्षे
सिनिअर केजी (बालवाडी-३/प्री-स्कूल-३): ५ ते ६ वर्षे
इयत्ता पहिली : ६ ते ७ वर्षे
तथापि, शाळा प्रमुखांना किमान आणि कमाल वयोमर्यादा एक महिन्यापर्यंत शिथिल करण्याचा अधिकार असेल. चालू सत्रातील विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होणार नाही. परिपत्रकात असे स्पष्ट केले आहे की, नवीन वयोमर्यादा २०२५-२६ सत्रातील विद्यार्थ्यांवर होणार नाही. विद्यमान नर्सरी, केजी आणि पहिली इयत्तेतील विद्यार्थी पुढील सत्रात विद्यमान रचनेनुसार सुरू राहतील.


नवीन रचना २०२७-२८ पासून लागू
२०२७-२८ पासून नवीन शैक्षणिक रचना पूर्णपणे लागू केली जाईल, जेव्हा ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजी वर्ग सुरू होतील. या वर्गांमध्ये प्रवेश नवीन वयोमर्यादेनुसार असेल. मागील शाळेतून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूट
मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण झालेल्या आणि त्यांचे शाळा सोडल्याचा दाखला (एसएलसी) आणि गुणपत्रिका असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी वयोमर्यादेतून सूट दिली जाईल.
शिक्षण संचालनालयाने सर्व शाळा प्रमुखांना या बदलांबद्दल पालकांना स्पष्टपणे माहिती देण्याचे आणि नवीन वयोमर्यादेचे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच