हातपाय बांधले आणि चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारले


मुंबई : चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण मुंबईतील गोरेगावमध्ये काही प्रमाणात खरी ठरली. गोरेगावच्या तीन डोंगरी परिसरात चार कामगारांनी चोर समजून केलेल्या मारहाणीत हर्षल रामसिंग परमा या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी सलमान खान, इसमुल्ला खान, गौतम चमार आणि राजीव गुप्ता या चौघांना गोरेगाव पोलिसांनी अटक केली.


हर्षल हा आई सुवर्णा आणि वडील रामसिंग परमा यांच्यासह मोतीलाल नगर, गोरेगाव येथे राहत होता. रात्री तो दारू पिण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. पहाटेच्या सुमारास तो राज पॅथ्रोन इमारतीजवळ आला तेव्हा नशेत होता. इमारतीत काम करणाऱ्या चार कामगारांनी चोर समजून हर्षलला घेरले आणि पकडले. हर्षलचे हातपाय बांधून नंतर त्याला मरेपर्यंत चोपले. या मारहाणीत हर्षलचा मृत्यू झाला. हर्षलला बेदम मारहाण करणारे चौघेजण थोड्या वेळाने घटनास्थळावरुन पसार झाले. इमारतीचा सुरक्षारक्षक पप्पू दूधनाथ यादव याने हर्षलला बघितले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येताच हर्षलला तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन हर्षलचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि चार कामगारांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला. गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी हर्षलची हत्या करणाऱ्या चौघांना शोधले आणि त्यांना अटक केले.


अटक केलेले चौघेजण राज पॅथ्रोन इमारतीत बांधकाम मजूर म्हणून कार्यरत होते. दिवसा काम करून ते इमारतीतच राहत असत. प्राथमिक चौकशीत त्यांनी हर्षलला चोर समजून मारहाण केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांना अटक करून बोरिवली येथील स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी इमारत तसेच भोवतालच्या परिसरातल्या सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने आणि साक्षीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला आहे.


Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी