हातपाय बांधले आणि चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारले


मुंबई : चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण मुंबईतील गोरेगावमध्ये काही प्रमाणात खरी ठरली. गोरेगावच्या तीन डोंगरी परिसरात चार कामगारांनी चोर समजून केलेल्या मारहाणीत हर्षल रामसिंग परमा या २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी सलमान खान, इसमुल्ला खान, गौतम चमार आणि राजीव गुप्ता या चौघांना गोरेगाव पोलिसांनी अटक केली.


हर्षल हा आई सुवर्णा आणि वडील रामसिंग परमा यांच्यासह मोतीलाल नगर, गोरेगाव येथे राहत होता. रात्री तो दारू पिण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. पहाटेच्या सुमारास तो राज पॅथ्रोन इमारतीजवळ आला तेव्हा नशेत होता. इमारतीत काम करणाऱ्या चार कामगारांनी चोर समजून हर्षलला घेरले आणि पकडले. हर्षलचे हातपाय बांधून नंतर त्याला मरेपर्यंत चोपले. या मारहाणीत हर्षलचा मृत्यू झाला. हर्षलला बेदम मारहाण करणारे चौघेजण थोड्या वेळाने घटनास्थळावरुन पसार झाले. इमारतीचा सुरक्षारक्षक पप्पू दूधनाथ यादव याने हर्षलला बघितले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येताच हर्षलला तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन हर्षलचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि चार कामगारांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला. गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी हर्षलची हत्या करणाऱ्या चौघांना शोधले आणि त्यांना अटक केले.


अटक केलेले चौघेजण राज पॅथ्रोन इमारतीत बांधकाम मजूर म्हणून कार्यरत होते. दिवसा काम करून ते इमारतीतच राहत असत. प्राथमिक चौकशीत त्यांनी हर्षलला चोर समजून मारहाण केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांना अटक करून बोरिवली येथील स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी इमारत तसेच भोवतालच्या परिसरातल्या सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने आणि साक्षीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला आहे.


Comments
Add Comment

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित

'ऊर्जा क्षेत्राला सक्षम करण्यासाठी कालबद्धरित्या प्रकल्पांची अंमलबजावणी करा'

मुंबई : राज्यात ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उदंचन जलविद्युत

मच्छिमार आणि महिला कामगारांसाठी विश्रामगृह तातडीने खुले करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : ससून डॉक येथील मच्छिमार, महिला कामगार आणि बोटधारकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन