मुंबईकरांनी दिवाळीत फटाक्यांसह केला कचरा, महापालिकेने तब्बल ३,००० टन जमा केला..

मुंबई (खास प्रतिनिधी): दीपावलीच्या पूर्वी करण्यात आलेली साफसफाई आणि या सणाच्या काळात भेटवस्तू तसेच फटाक्यांचा कचरा यामुळे मुंबईतील दैनंदिन कचऱ्यात वाढ झाली आहे. या सणाच्या काळात तब्बल ३ हजार टन अतिरिक्त कचरा निर्माण झाला आहे.


सणासुदीच्या काळात शहरात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या मोठ्या वाढीचा मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) प्रभावीपणे सामना करत शहरात कचऱ्याचा वेळेत व सुरळीत साफसफाई करत शहर आणि उपनगराचा परिसर स्वच्छ राखण्याचा प्रयत्न केला.


गेल्या काही दिवसांत शहरात नेहमीपेक्षा सुमारे ३,००० मेट्रिक टन अतिरिक्त कचरा निर्माण झाला असून त्यापैकी २,०७५ मेट्रिक टन कचरा कांजूर व देवोनार डेपो येथे निपटारा करण्यात आला आहे, तसेच सुमारे १,००० मेट्रिक टन कचरा ट्रान्स्फर स्टेशनवरून उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.


सप्टेंबर २०२५ पर्यंत दररोज सरासरी कचरा निपटारा ६,९०० टन इतका होता, तर गेल्या काही दिवसांत तो वाढून ७,३०० टन प्रतिदिन इतका झाला आहे. सणांच्या काळात ही वाढ सरासरी ६००–७०० टन प्रतिदिन इतकी झाली असून, बीएमसीच्या सज्जतेमुळे ही वाढ प्रभावीपणे हाताळण्यात आली आहे.सणासुदीच्या काळात शहरातील सर्व वॉर्डांमध्ये सफाई पथकांनी अतिरिक्त शिफ्टमध्ये काम करून रस्त्यांवरील व संकलन केंद्रांवरील कचरा त्वरित उचलला जात आहे


“सणासुदीच्या काळात अवघ्या काही दिवसांत ३,००० टनांहून अधिक कचरा निर्माण झाला. बीएमसीच्या सर्व पथकांनी दिवस-रात्र काम करून हा अतिरिक्त कचरा वेळेत हाताळला. वेळेत केली गेलेली ही साफसफाई आमच्या सज्जतेचे आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचे तथा कार्यतत्परतेच प्रतिक आहे.” - किरण दिघावकर, उपयुक्त (घनकचरा व्यवस्थापन)




 
Comments
Add Comment

Nashik Simhastha 2027 : कुंभ २०२७साठी एआयची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा, जागतिक कंपन्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अधिक सुरक्षित, सुरळीत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित

Harihareshwar येथे खगोल दर्शन महोत्सव

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, पर्यटन

Eknath Shinde : 'गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करा'

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करून टप्पा दोन बाबतचा

Governor of Maharashtra : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा, राज्यपालांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात कृषी उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५०

AI च्या मदतीने दूध भेसळ रोखण्यासाठी IIT ची मदत घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई : राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली

hydroelectric project : उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेबरोबर ५ हजार २०० कोटींचा करार

मुंबई : जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात मुख्यमंत्री