फटाक्यांच्या आवाजाने संतापलेल्या व्यक्तीने केला अ‍ॅसिड हल्ला

लक्सर : हरिद्वारमधील लक्सर तालुक्यातील भिक्कमपूर जीतपूर गावात दिवाळीच्या रात्री घडलेल्या अमानुष घटनेने परिसर हादरला आहे. फटाक्यांच्या आवाजामुळे संतप्त झालेल्या एका व्यक्तीने खेळत असलेल्या मुलांवर अॅसिड फेकले. या अॅसिड हल्ल्यात ५ जण जखमी झाले असून एका मुलाची प्रकृती गंभीर आहे.


मंगळवारी रात्री ९ वाजता १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांचा एक गट गावात फटाके फोडत होता. त्याच परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने मुलांना फटाके फोडण्यास मनाई केली. मात्र मुलांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने आपल्या घराच्या छतावरून अॅसिडचा डबा थेट त्यांच्या दिशेने फेकला. अॅसिड मुलांवर उडाल्याने ते भाजले आणि परिसरात क्षणात गोंधळ उडाला.


या घटनेत शेरसिंग यांचे मुलगे राहुल आणि दीपक, बहादूर यांचा मुलगा सौरभ, बालेश यांचा मुलगा पंकज, आणि लाहोरसिंग यांचा मुलगा विशाल हे जखमी झाले. तातडीने ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. चार मुलांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर सौरभ हा सुमारे ५० टक्के भाजल्याने त्याला मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले.


घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपी व्यक्तीला पकडून त्याला मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस महानिरीक्षक राजीव रौथन यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, गावात तणावाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment

कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, प्रजासत्ताक दिनी दिसले देशाचे सामर्थ्य

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात

मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

पंचम' डिजिटल चॅटबॉट लाँच, घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीशी संबंधित कामे मार्गी लागणार

नवी दिल्ली : गावांमधील प्रशासकीय कामे अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने

तामिळनाडूमध्ये हिंदीवर बंदीच राहणार, मुख्यमंत्री स्टॅलिनचा केंद्राला स्पष्ट इशारा

चेन्नई : तामिळनाडूमध्ये हिंदी लादण्यास कुठलेही स्थान नाही आणि कधीही होणार नाही, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि

तेजस्वी यादव आरजेडीचे कार्यकारी अध्यक्ष

पाटणा: पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा निर्णय घेतला असून

महाराष्ट्र 'पद्म'मय, 'पद्मविभूषण'सह १५ पुरस्कारांवर राज्याची मोहोर

धर्मेंद्र यांना (मरणोत्तर) पद्मविभूषण , अलका याज्ञिक यांना 'पद्मभूषण'तर रोहित शर्माला 'पद्मश्री' तारपा सम्राट'