गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द


पुणे : गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयाने हा आदेश जारी केला आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळ बाबत अहवाल सादर केला होता. यानंतर पासपोर्ट प्रदेश कार्यालयाने घायवळचा पासपोर्ट रद्द केल्याचा आदेश काढला आहे. पासपोर्ट रद्द झाल्यामुळे गुंड निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत.


घायवळने खोटी माहिती देऊन, बनावट कागदपत्रे सादर करुन पासपोर्ट काढला होता. याच पासपोर्टच्या मदतीने तो परदेशात फरार झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. या पार्श्वभूमीवर घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.


गुंड निलेश घायवळने Ghaywal या नावातील h काढून Gaywal असे केले. यानंतर त्याने गायवळ या नावाने अहिल्यानगरमधील खोटा पत्ता दाखवत 23 डिसेंबर 2019 रोजी तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला होता. पासपोर्ट मिळाल्यानंतर त्याचा वापर करुन तो फरार झाला, असे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पुरावे सादर केल्यानंतर पासपोर्ट प्रदेश कार्यालयाने घायवळचा पासपोर्ट रद्द केला. जो पासपोर्ट १६ जानेवारी २०२० रोजी गायवळ या नावाने देण्यात आला तो पासपोर्ट तातडीने पुणे पोलिसांकडे अथवा पासपोर्ट प्रदेश कार्यालयाकडे जमा करावा, असेही पासपोर्ट प्रदेश कार्यालयाच्या आदेशात नमूद आहे.


घायवळवर पुण्यात सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करणे, कायद्याचे उल्लंघन करणे, दरोडा टाकणे असे विविध गंभीर गुन्हे नोंदवले आहेत. पुणे पोलीस सध्या फरार असलेल्या गुंड निलेश घायवळला शोधत आहेत.


Comments
Add Comment

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन - मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आंदोलनात सहभाग; मनमानी चालू देणार नाही पुल होणारच

मुंबई : चर्नी रोड-गिरगाव पुलाला विरोध करून जनतेला वेठीस धरणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात

गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील संघर्ष पुन्हा उफाळला - मनोमिलन ठरले औटघटकेचे; नवी मुंबईकरांचे भूखंड घशात घातल्याचा आरोप

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील सत्तासमीकरणे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहेत. विशेषतः

Mulund Metro Slab: थेट रिक्षावर कोसळला मेट्रोचा स्लॅब; ३ ते ४ जण जखमी तर एकाच मृत्यू

मुलुंड: मुलूंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा अचानक स्लॅब कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लॅबखाली एका

AC Local : पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! १९ फेब्रुवारीपासून धावणार १२ नवीन एसी लोकल; लोकल फेऱ्यांमध्येही वाढ

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुखकर आणि गारवा देणारा ठरणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी

अंधरेतील पहिल्या पुष्पोत्सवाचे प्रसिद्ध अभिनेते पद्मश्री अक्षय कुमारच्या हस्ते उद्घाटन

भाजपच्या ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ अभियानांतर्गत अभिनेता अक्षय कुमार यांनी दिलेल्या शहरव्यापी