गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द


पुणे : गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयाने हा आदेश जारी केला आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळ बाबत अहवाल सादर केला होता. यानंतर पासपोर्ट प्रदेश कार्यालयाने घायवळचा पासपोर्ट रद्द केल्याचा आदेश काढला आहे. पासपोर्ट रद्द झाल्यामुळे गुंड निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत.


घायवळने खोटी माहिती देऊन, बनावट कागदपत्रे सादर करुन पासपोर्ट काढला होता. याच पासपोर्टच्या मदतीने तो परदेशात फरार झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. या पार्श्वभूमीवर घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.


गुंड निलेश घायवळने Ghaywal या नावातील h काढून Gaywal असे केले. यानंतर त्याने गायवळ या नावाने अहिल्यानगरमधील खोटा पत्ता दाखवत 23 डिसेंबर 2019 रोजी तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला होता. पासपोर्ट मिळाल्यानंतर त्याचा वापर करुन तो फरार झाला, असे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी पुरावे सादर केल्यानंतर पासपोर्ट प्रदेश कार्यालयाने घायवळचा पासपोर्ट रद्द केला. जो पासपोर्ट १६ जानेवारी २०२० रोजी गायवळ या नावाने देण्यात आला तो पासपोर्ट तातडीने पुणे पोलिसांकडे अथवा पासपोर्ट प्रदेश कार्यालयाकडे जमा करावा, असेही पासपोर्ट प्रदेश कार्यालयाच्या आदेशात नमूद आहे.


घायवळवर पुण्यात सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करणे, कायद्याचे उल्लंघन करणे, दरोडा टाकणे असे विविध गंभीर गुन्हे नोंदवले आहेत. पुणे पोलीस सध्या फरार असलेल्या गुंड निलेश घायवळला शोधत आहेत.


Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

नवी दिल्ली लाल किल्ला कार स्फोट प्रकरणात तपासात नवे धक्कादायक खुलासे!

नवी दिल्ली : ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी घडलेल्या कार स्फोट प्रकरणात तपासाला मोठा वळण आले आहे.

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी, दोषींवर नियमानुसार होणार कारवाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात किल्ल्यांना महत्त्व आहे. पण धमालमस्ती करताना

दिल्लीत जैश-ए-मोहम्मदकडून हवालामार्गे आले २० लाख ? तपासकर्त्यांसमोर नवीन कोडे

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासात गुप्तचर यंत्रणांना डॉ. उमर, डॉ.