जे.जे.हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या मुलांनी साकारला किल्ला

मुंबई : दिवाळीत किल्ला बनवण्यामागे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा आदर करणे, शौर्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक म्हणून हे मनामध्ये रुजवणे, आणि मुलांना ऐतिहासिक जाणीव करून देणे ही प्रमुख कारणे आहेत. या प्रथेमुळे मुलांमध्ये कणखरपणा, शौर्य आणि सर्जनशीलता वाढते, तसेच ही एक आनंददायक आणि विरंगुळ्याची कृती आहे.


किल्ला हे शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक मानले जाते. दिवाळीत किल्ला बनवून महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदराने सन्मान केला जातो. येणाऱ्या पिढ्यांमध्ये कणखरपणा जावा आणि शिवकालीन स्वराज्याची कल्पना रुजावी यासाठी दिवाळीत किल्ला बांधण्याची प्रथा सुरू झाली. मुलांना किल्ला बनवताना सिंहासनावर शिवाजी महाराज आणि मावळ्यांची प्रतिष्ठापना करून त्यांच्या शौर्याची आठवण करून दिली जाते.


दिवाळीत किल्ला बांधल्याने मनात सकारात्मकतेची भावना निर्माण होते, असे मानले जाते. किल्ला बनवण्यासाठी आयुष तांबे, अंश वाघ, पार्थ बिडवे, अनन्य सुरडकर, अभिषेक देशमुख, शुभम कुंभार, आदित्य देशमुख, चैतन्य सुरडकर,यांचा मोलाचा वाटा आहे. अशी माहिती तृतीय श्रेणी संघटनेचे अध्यक्ष सुरेश तांबे यांनी दिली.

Comments
Add Comment

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, 'वंदे भारत'च्या फेऱ्या वाढल्या

मुंबई : कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईहून कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वंदे

काँग्रेसची भूमिका स्पष्ट : मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंशी युती नाकारली

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना, काँग्रेसने आपली भूमिका

दहा महिन्यांमध्ये गॅस सिलिंडर स्फोटांच्या ४७ दुघर्टना... एवढ्यांचे बळी, एवढे झाले जखमी

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईमध्ये सध्या आगीच्या दुघर्टनांमध्ये वाढत होत असून यामध्ये प्राधान्य क्रम हा सदोष

ओशिवरा नाल्यावरील पुलाचा खर्च वाढला, तब्बल ४० टक्क्यांनी अधिक वाढ

मुंबई (सचिन धानजी) : गोरेगाव (पश्चिम) एस व्ही रोडवरील ओशिवरा नाल्यावरील पुल पाडून नव्याने त्याची पुनर्बांधणी

दिवाळी पाडवा: जाणून घ्या महत्त्व आणि साजरा करण्याची पद्धत 

मुंबई: दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. दिवाळीच्या

महापालिकेत निवडणुकीची लगबग, महापौरांसह विविध अध्यक्ष, पक्ष कार्यालयांच्या डागडुजीला सुरुवात

मुंबई(सचिन धानजी) : राज्यातील मुंबई महापालिकेसहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निव