१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) हाणून पाडला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात अवैधरीत्या चिनी फटाके आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तस्कर टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून, सुमारे १० कोटी रुपये किमतीचे तब्बल १.३० लाख फटाके जप्त करण्यात आले आहेत.


'ऑपरेशन फायर ट्रेल' या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, देशातील दोन प्रमुख बंदरांवरून ही तस्करी उघडकीस आली आहे.


डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी न्हावा शेवा बंदरात चीनहून आलेल्या एका कंटेनरची कसून तपासणी केली. यामध्ये वरच्या थरावर कपडे ठेवले होते, पण खोलवर पाहणी केल्यानंतर ४६,६४० चिनी फटाके आढळून आले. या खेपाची अंदाजित किंमत ४.८२ कोटी रुपये आहे.


तपासाअंती या तस्करीमागे असलेल्या टोळीचा शोध लागला असून, गुजरातमधील वेरावळ येथे एका मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे. या टोळीच्या ताब्यातून बेकायदेशीर कागदपत्रे आणि साठवणूक यंत्रणेचे पुरावे देखील हस्तगत करण्यात आले आहेत.


याचप्रमाणे, तुतिकोरिन बंदरावर देखील डीआरआयने दुसऱ्या कारवाईत ८३,५२० चिनी फटाके जप्त केले आहेत. या फटाक्यांना 'इंजिनिअरिंग गुड्स' म्हणून चुकीचं लेबल लावून देशात आणण्याचा प्रयत्न केला जात होता. हे फटाके सिलिकॉन सीलंट गनच्या झाकणाखाली लपवण्यात आले होते. ही खेप सुमारे ५.०१ कोटी रुपये किमतीची होती.


अशा प्रकारच्या बेकायदेशीर आयातीवर बंदी आहे. विदेश व्यापार धोरणानुसार फटाक्यांची आयात प्रतिबंधित असून, त्यासाठी डीजीएफटी आणि पेट्रोलियम व स्फोटक सुरक्षा संघटनेच्या मान्यतेची आवश्यकता असते.


अशा धोकादायक वस्तूंची आयात केवळ कायदाविरोधीच नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेसाठीही गंभीर धोका ठरू शकते. डीआरआयच्या या सतर्क कारवाईमुळे, सणासुदीच्या काळात देशात अवैध चिनी फटाके पोहोचण्यापासून रोखण्यात यश मिळालं आहे.

Comments
Add Comment

बीसीसीआयचा एसीसीवर दबाव, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावरून कारवाईचा इशारा

नवी दिल्ली : आशिया कप २०२५ नंतर विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. ही ट्रॉफी मिळाली नाही तर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या

नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?

नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २०

रेड कॉरिडॉर आता ग्रोथ कॉरिडॉर बनला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पोलिस स्मृतीदिनानिमित्त वक्तव्य

नवी दिल्ली: पोलीस स्मृतीदिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील पोलीस आणि सुरक्षा दलांच्या