विषारी कफ सिरप प्रकरणात ‘कोल्ड्रिफ’ कंपनीचा मालक न्यायालयीन कोठडीत

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात २० हून अधिक निष्पाप बालकांचा बळी घेणाऱ्या विषारी कफ सिरप ‘कोल्ड्रिफ’ प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या सिरपचे उत्पादन करणाऱ्या तामिळनाडूस्थित श्रीसेन फार्मा कंपनीचे मालक रंगनाथन गोविंदन यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे.


या प्रकरणात गोविंदन यांना यापूर्वी १० दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. या दरम्यान विशेष तपास पथक (SIT) ने त्यांची चौकशी तामिळनाडूतील कांचीपुरम येथे केली. कोठडी संपल्यानंतर त्यांना परसिया येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश गौतम गुर्जर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने रंगनाथन गोविंदन यांना न्यायालयीन कोठडी दिली.


SIT प्रमुख जितेंद्र सिंग जाट यांनी सांगितले की, या प्रकरणात छिंदवाडातील डॉ. प्रवीण सोनी, घाऊक औषध विक्रेता राजेश सोनी आणि डॉ. सोनी यांच्या पत्नीच्या मेडिकल स्टोअरमधील फार्मासिस्ट सौरभ जैन हे तिघेही आधीच कोठडीत आहेत. तपासात उघड झाले आहे की ‘कोल्ड्रिफ’ सिरप प्यायल्यानंतर अनेक मुलांच्या किडनी निकामी झाल्या आणि त्यामुळे मृत्यू झाले.


या धक्कादायक घटनेनंतर सरकारने तत्काळ पावले उचलली आहेत. राज्य सरकारने दोन औषध निरीक्षक आणि FDAचे उपसंचालक यांना निलंबित केले असून, राज्याच्या औषध नियंत्रकाची बदली करण्यात आली आहे. तसेच, संबंधित औषध उत्पादन युनिट सील करण्यात आले आहे.


दरम्यान, स्थानिक न्यायालयाने डॉ. सोनी यांचा जामीन अर्ज फेटाळला असून त्यांनी आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणामुळे औषधनिर्मिती क्षेत्रातील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, सरकारकडून भविष्यात कडक कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

लांजात जि.प.च्या ४ तर पं.स.च्या पाच उमेदवारांनी अर्ज मागे, जि.प. साठी ९ तर पंचायत समितीसाठी २६ उमेदवार रिंगणात

लांजा (संतोष कोत्रे) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या २७ जानेवारी रोजी

सावंतवाडी तालुक्यात एक जिल्हा परिषद तर एक पंचायत समिती सदस्य बिनविरोध

शेर्ले पंचायत समिती गणातून भाजपचे महेश धुरी बिनविरोध, तालुक्यात तब्बल ४८ जणांनी अर्ज घेतले मागे सावंतवाडी :

पक्षशिस्तीचे उदाहरण : खासदार नारायण राणेंच्या आदेशानुसार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवींची निवडणुकीतून माघार

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली

राजापुरात जि.प. गटातून चार जणांची तर पंचायत समिती गणातुन १६ जणांची माघार

राजापूर : :राजापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरीता मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या

परळी वैजनाथमध्ये १३ फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे तेरा ते पंधरा फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'अखिल भारतीय पशुपक्षी

पनवेल महापालिकेचा डंका, १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत इ गव्हर्नन्समध्ये राज्यात प्रथम

पनवेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत इ गव्हर्नन्स