Sunday, October 19, 2025
Happy Diwali

सायन, कुर्ला बीकेसीतील प्रवाशांना मिळणार नवा पूल, वाहतूक कोंडी होणार दूर

सायन, कुर्ला बीकेसीतील प्रवाशांना मिळणार नवा पूल, वाहतूक कोंडी होणार दूर

मुंबई : मिठी नदीवर नवा पूल बांधण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ३०३ कोटी इतका खर्च येणार असून . या पुलामुळे दोन फायदे होतील पुलामुळे वाहतूक कोंडीही दूर होईल. मिठी नदीचा प्रवाह सुद्धा सुरळीत होईल. असा दावा महापालिकेने केला आहे.

२००५ च्या अतिवृष्टीनंतर डॉ. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तथ्य शोधन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने मिठी नदीचे पात्र सध्याच्या ६८ मीटरवरुन १०० मीटर पर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती. त्यानुसारच शीव - धारावी आणि पश्चिम उपनगरातील वांद्रेला जोडणाऱ्या पुलाची पुनर्बांधणी करून रुंदी वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. आणि ही कामं दोन टप्प्यात करण्यात येणार आहे.

वांद्रे पूर्व येथील ड्राईव्ह इन थिएटर जवळून मिठी नदी वाहते. आणि या मिठी नदीवरून जाणाऱ्या पुलावरून वाहनांची गर्दी वाढली आहे. सायन, कुर्ला, धारावी, बीकेसी, आणि कलिना येथे जाण्यासाठी धारावी येथील पूल महत्वाचा मानला जातो. पुलाची रुंदी कमी असल्याने प्रवाश्याना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात मिठी नदी तुडुंब वाहू लागते त्यामुळे पुलाची रुंदी आणि उंचीही कमी असल्याने पाण्याच्या प्रवासातही अडथळा निर्माण होतो. त्यामुळेच पुलाची रुंदी आणि उंची वाढवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

आणखी एका पुलाची उभारणी

जुना पूल पाडल्यावर नवीन भक्कम पूल बांधेपर्यंत त्याला पर्याय म्हणून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या पुलाच्या बाजूलाच एक तात्पुरता पूल बांधण्यात येणार आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा