गुणसुंदर

जीवनगंध : पूनम राणे


एक शहर होते. त्या शहरात मोठमोठ्या इमारती, दुकानं होती. तेथील परिसर खूप सुंदर होता. त्या शहरात हिना नावाची एक सुंदर स्त्री राहत होती. हिना घरातील सर्व काही पाहायची. सामान आणणे, भाजीपाला आणणे.


एके दिवशी हिनाच्या घरी पाहुणे येणार होते. म्हणून ती बाजारात भाज्या आणायला गेली. मोठ्या पदराची साडी, गळ्यात गंठण, कानात झुमके, पायात हिलवाली चप्पल घालून ती बाजारात गेली. आज खरं म्हणजे त्या शहरातील आठवड्याच्या बाजारचा दिवस होता. हिनाने भरपूर सामान खरेदी केले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने होती. प्रचंड गर्दी झालेली होती. हिना एका हातात दोन-तीन पिशव्यांचं ओझं सावरत चालत होती. चालता चालता तिने बसस्टँडवर उभ्या असलेल्या दोन मुलींना पाहिले.


एक मुलगी रंगाने गोरीपान, छान सलवार सूट घेऊन, मेकअप करून, हातात सोनेरी घड्याळ व पर्स घेऊन ती उभी होती, तिच्याच बाजूला एक रंगाने सावळी, अंगात जीन्स पँट, टीशर्ट, लहान केस, पाठीवर दप्तर, बहुतेक काॅलेजला जात असावी.


हिना चालता चालता गोऱ्या मुलीबद्दल मनातच मनात विचार करू लागली, ‘किती सुंदर मुलगी आहे, तिचे कपडे छान आहेत, वा! मुलगी असावी तर अशी’ मग तिची नजर त्या बाजूच्या सावळ्या मुलीकडे गेली. मनातच बोलू लागली,‘काय मुलगी आहे, जरासुद्धा शिस्त नाही, काय ते कपडे, काळी कुठली.” असे बोलून ती पुढे चालू लागली, चालता चालता टिनाचा तोल जाऊन ती खाली पडली.


गोरी मुलगी तिच्या पडण्यावर जोरजोरात हसून तेथून निघून गेली. हे हिनाने पाहिले, तिला तिचा खूप राग आला, पण दुसरी सावळी मुलगी धावत धावत येऊन हिनाला उठवण्यास मदत करू लागली. तिचे अस्थाव्यस्त पडलले सामान उचलण्यास मदत करू लागली. विचारपूस करू लागली. ती म्हणाली,” ताई, तुम्ही ठीक आहात ना .” मी तुम्हाला तुमच्या घरी सोडायला येते. हिना गालात हसली, त्या सावळ्या मुलीला म्हणाली, “आभारी आहे तुझी.” मी जाईन घरी. हिनाला स्वतःचीच लाज वाटू लागली, ती मनातच हिरमुसली. तिला स्वतःचा राग येऊ लागला. तिला जाणीव झाली, खरंच जगात सुंदर चेहेऱ्यापेक्षा ज्याचे मन सुंदर आहे हे आपणांस ओळखता आले पाहिजे.


तात्पर्य : माणसाच्या रंगावरून, कपड्यांवरून तो कसा असेल याचा विचार न करता गुणांचा विचार करा. माणसाच्या रंगापेक्षा त्याचे गुणच त्याला समाजात मोठा मान मिळवून देतात.

Comments
Add Comment

जीवनशिक्षण

जीवनगंध,पूनम राणे विवारचा दिवस होता. खूप दिवस घराची साफसफाई करणे बाकी होते. आईने आदल्या दिवशी सर्वांना बजावून

प्रेम म्हणजे ऑक्सिजन

मनस्विनी,पूर्णिमा शिंदे प्रेम हे आपल्या संस्कृतीचं पवित्र मूल्य. शब्दांना प्रेमाचा ओलावा लागला की जीवनालाच एक

तिमिरातून तेजाकडे...

अंधार कोणाच्या आयुष्यात नाही असं होतं का? कधी बाहेरचा, तर कधी आतला, पण प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या

मदालसा

महाभारतातील मोतीकण,भालचंद्र ठोंबरे आपली मुले जन्म-मरणाच्या चक्रामध्ये न गुरफटता त्यांना मुक्ती मिळावी या

माझा आयुष्यातील पहिला ट्रेक : ‘हरिश्चंद्रगड’

संवाद,गुरुनाथ तेंडुलकर डोंबिवलीचे ट्रेकर विजय वाठारे (आनंद यात्रा पर्यटन) यांनी तीन दिवसांची हरिश्चंद्रगड

छोडो कलकी बातें...

र्वी एकंदर समाजाच्या मानसिकतेचा विचार करून सिनेमाचे कथानक आणि गाणीही लिहिली जात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बरीच