पैसे भरायला सांगताच शिल्पा शेट्टीचा विचार बदलला

मुंबई : बॉलिवूड फिटनेस आयकॉन शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा या दोघांवर ₹६० कोटीच्या फसवणुकीचा आरोप आहे. हा खटला मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अलिकडेच न्यायालयाने कारवाई करत या जोडप्याला देश सोडून जाऊ नये असे आदेश दिले. यावर युक्तिवाद करताना शिल्पा शेट्टी आणि राजच्या वकिलाने कामासाठी परदेशी जाणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला. या युक्तिवाद करताच न्यायालयाने एक अट घातली. ही अट समजताच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांनी परदेशी जाण्याचा विचार सोडून दिला आहे.


मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांना परदेशात जाण्यापूर्वी ₹६० कोटी जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. ₹६० कोटींच्या फसवणुकीशी संबंधित एफआयआर संदर्भात त्यांच्याविरुद्ध जारी केलेला एलओसी रद्द करण्यासाठी या जोडप्याने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे.



शिल्पा शेट्टीने न्यायालयाला माहिती दिली


शिल्पा शेट्टीने आता मुंबई उच्च न्यायालयाला कळवले आहे की तिने तिचा नियोजित परदेश दौरा रद्द केला आहे. तिने सांगितले की न्यायालयाकडून परवानगी नसल्यामुळे तिने हा दौरा रद्द केला आहे.



दोन्ही वेळा उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास दिला नकार


लूकआउट नोटीस रद्द करण्याच्या प्रकरणावर दोनदा सुनावणी झाली आणि दोन्ही वेळा न्यायालयाने शिल्पा शेट्टीला दिलासा देण्यास नकार दिला.



नेमकं प्रकरण काय ?


उद्योगपती दीपक कोठारी यांनी अलीकडेच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा खटला दाखल केला आहे. कोठारींचा आरोप आहे की शिल्पा शेट्टीने तिच्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी ₹७५ कोटींचे कर्ज घेतले होते, परंतु व्याजदरांमुळे ते वैयक्तिक गुंतवणूक म्हणून घेण्यास सांगितले. तिने कोठारींना आश्वासन दिले की ती मासिक व्याज देईन, परंतु शिल्पाने ते पैसे व्यवसायात गुंतवले नाहीत, त्याऐवजी ते वैयक्तिक खर्चासाठी वापरले आणि नंतर संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दीपक कोठारी यांनी अभिनेत्रीला वारंवार पैसे परत करण्याची मागणी केली, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दीपक कोठारी यांनी शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला आहे.

Comments
Add Comment

अलविदा ही मॅन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. वयाशी संबंधित आजारांमुळे काही दिवसांपासून ते

‘द केरळ स्टोरी’ फेम अदाला मोठा धक्का; लाडक्या आजीचे निधन, महिनाभर सुरू होते उपचार

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री अदा शर्मा सध्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या दुःखातून जात आहे. ‘द केरळ स्टोरी’मुळे

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ चित्रपट चर्चेत; रणवीर, माधवन, रामपाल कोणाची भूमिका साकारतायत?

मुंबई : बॉलिवूडचा ऊर्जावान अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट रिलिजच्या प्रतिक्षेत असून,

चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : अयोध्येचा राजा, माणूस, कुंकू, झनक झनक पायल बाजे, डॉ. कोटनीस की अमर कहानी, दो आँखे बारा हाथ, नवरंग, पिंजरा’

लोकल ट्रेन मधील धक्कादायक अनुभवाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री गिरीजा ओक?

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री गिरीजा ओक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘तारे जमीन पर’, ‘शोर इन

‘धुरंधर’चा रनटाईम १८५ मिनिटे ? रणवीरच्या कारकिर्दीतील सर्वात लांब चित्रपट

मुंबई : धुरंधरच्या ट्रेलरने सध्या प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. हा ट्रेलर १२ नोव्हेंबर रोजी लाँच