वर्ल्डकपमध्ये दोन पराभव, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल का? जाणून घ्या समीकरण

मुंबई: महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभवास सामोरे जावे लागले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ३ विकेट्सनी पराभव केला. हा भारताचा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव होता. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला होता.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाचे उपांत्य फेरीचे समीकरण खालीलप्रमाणे आहे


चार सामने खेळल्यानंतर भारतीय संघ ४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.तर ऑस्ट्रेलिया ४ सामन्यांत ३ विजय आणि १ अनिर्णितसह ७ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. महिला विश्वचषकाच्या नियमांनुसार, गटातील सर्व ८ संघ एकमेकांविरुद्ध एक-एक सामना खेळतील आणि शीर्ष चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊनही, टीम इंडियाच्या उपांत्य फेरीच्या आशा अजूनही कायम आहेत. समीकरण पूर्णपणे भारताच्या हातात आहे


भारतीय महिला संघाला उपांत्य फेरीत सहज आणि निश्चित प्रवेश मिळवण्यासाठी त्यांच्या उर्वरित तीनपैकी कमीतकमी दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. भारताला पुढील सामने इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहेत.


जर टीम इंडियाने त्यांचे उर्वरित तिन्ही सामने जिंकले, तर ते थेट टॉप-४ मध्ये आपले स्थान निश्चित करतील आणि त्यांना नेट रन रेटची काळजी करण्याची गरज भासणार नाही. अशा परिस्थितीत, भारत एकूण १० गुणांसह क्वालिफाय होईल. जर भारताने उर्वरित ३ पैकी दोनपेक्षा जास्त सामने गमावले, म्हणजेच केवळ एकच सामना जिंकला किंवा तिन्ही गमावले, तर त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश अत्यंत कठीण होईल.


अशा परिस्थितीत, भारताला इतर संघांच्या सामन्याच्या निकालांवर (उदा. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंडच्या पराभवावर) अवलंबून राहावे लागेल. तसेच, गुण समान झाल्यास नेट रन रेट (NRR) महत्त्वाची भूमिका बजावेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे भारताच्या नेट रनरेटवर थोडा परिणाम झाला आहे.


भारतीय संघाला उपांत्य फेरीचा मार्ग सोपा करण्यासाठी, त्यांनी पुढील तीनपैकी किमान दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. विशेषत: इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धचे सामने निर्णायक ठरणार आहेत.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : जसप्रीत बुमराह श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर; औकिब नबीला पहिल्यांदाच टीम इंडियात संधी

नवी दिल्ली: भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी

Commonwealth Games 2026 : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप; 2030 स्पर्धेची धुरा आता भारताकडे

Commonwealth Games 2026  : ग्लासगो येथे पार पडलेल्या 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा रविवारी रात्री भव्य समारोप सोहळा पार पडला.

Commonwealth Games 2026 : ग्लासगोतील रेस्टॉरंटमध्ये भारताचा अपूर्ण नकाशा; लव्हलिना बोरगोहेन यांनी व्यक्त केली नाराजी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 भारताच्या यशस्वी कामगिरीनिमित्त ग्लासगोमधील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आयोजित

Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी; 39 पदकांसह चौथे स्थान, बॉक्सिंगमध्ये सर्वाधिक 7 सुवर्ण

ग्लासगो येथे पार पडलेल्या 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने उल्लेखनीय कामगिरी करत पदकतालिकेत चौथे स्थान

Jasprit Bumrah : बुमराह श्रीलंका दौऱ्याला मुकणार ? दुखापतीमुळे निवड समितीसमोर पर्यायांचा प्रश्न

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) १५ ऑगस्टपासून गाले येथे सुरू होणाऱ्या

Abhishek Sharma : अभिषेक शर्माचा धूमधडाका, ९१ चेंडूत केल्या एवढ्या धावा की प्रतिस्पर्धी धास्तावले

नवी दिल्ली : अमृतसर विरुद्ध तरन तारन मेन सिनिअर या स्थानिक सामन्यात भारतीय क्रिकेट टीमचा सलामीवीर अभिषेक शर्मा