Mumbai Politics : राऊत नेमके काय म्हणाले? राऊतांच्या 'त्या' विधानाने ठाकरेंच्या युतीत मिठाचा खडा?

राऊतांच्या 'त्या' विधानावर मनसे नेत्यांची तीव्र नाराजी; मनसे 'शिवतीर्थ'वर आक्रमक!


मुंबई: ठाकरे बंधू म्हणजेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांना जोर पकडलेला असतानाच, खासदार संजय राऊत यांच्या एका विधानामुळे मोठा राजकीय मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे. राज ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत यावेत आणि त्यांना काँग्रेससोबत जाणे आवश्यक वाटते, ती त्यांची भूमिका आहे, असे सूचक वक्तव्य राऊत यांनी केले आणि मनसेत तीव्र नाराजी पसरली.

राज ठाकरेंच्या भूमिकेवर राऊतांनी काय म्हटले?


आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांना, राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार का आणि काँग्रेस त्यांना स्थान देणार का, असे प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, "स्वतः राज ठाकरे यांची अशी इच्छा आहे की, आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचे आहे. त्यांची ही भूमिका आहे. निर्णय नाही!" राऊत यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली.

?si=-OR6vodm5nhSYVO0

मनसे नेत्यांकडून थेट 'शिवतीर्थ'वर आक्षेप


संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे मनसेमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. राऊतांनी केलेले हे विधान मनसे नेत्यांना अजिबात मान्य नसल्याचे दिसत आहे. आज मनसे नेत्यांनी थेट राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या 'शिवतीर्थ' येथे तातडीची बैठक घेतली. याच बैठकीत नेत्यांनी राऊत यांच्या विधानाबद्दल थेट पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे आक्षेप नोंदवला आणि नाराजी व्यक्त केली.

पत्रकारांशी बोलताना मनसेचे पक्षनेते संदीप देशपांडे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. "आमच्या पक्षाची भूमिका आम्ही योग्य वेळी मांडू. काँग्रेसला आम्ही कोणताही प्रस्ताव दिलेला नाहीये. आमच्या पक्षाची भूमिका पक्षाचे प्रमुख राज ठाकरेच स्पष्ट करतील," असे स्पष्टीकरण देत त्यांनी राऊतांचे विधान फेटाळले.

रुग्णालयातून राऊतांचा 'तो' मेसेज


दरम्यान, या राजकीय नाट्यमय घडामोडींदरम्यान आज दुपारी खासदार संजय राऊत यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या इथे काही चाचण्या झाल्या होत्या. आज पत्रकार परिषदेतही त्यांची प्रकृती अस्वस्थ दिसत होती. पत्रकार परिषद आटोपल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महत्वाचे म्हणजे, आपल्या वक्तव्यामुळे मनसेत गैरसमज निर्माण झाल्याचे लक्षात येताच, राऊत यांनी रुग्णालयातूनच तातडीने राज ठाकरे यांना मोबाईलवरून मेसेज केल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. "मी असे काहीही बोललो नाही," असा मेसेज संजय राऊत यांनी राज ठाकरेंना पाठवला आहे. आपल्या वक्तव्याचा तसा अर्थ नसल्याचे त्यांनी मेसेजमध्ये स्पष्ट केल्याची माहिती आहे.

काँग्रेसची मुंबईत स्वबळावर लढण्याची तयारी?


एकीकडे युती-आघाडीची चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे काँग्रेस पक्षातही मोठी घडामोड झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक काँग्रेसने स्वबळावर आणि स्वतंत्रपणे लढवावी, अशी चर्चा बैठकीत झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे महाविकास आघाडीतील संभाव्य जागावाटप आणि युतीचे समीकरण अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची

शिर्डी अ‍ॅसिड हल्ल्याचे विधिमंडळात तीव्र पडसाद - आरोपीला कठोरातील कठोर शासन करणार; पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची ग्वाही

मुंबई : शिर्डी जवळील लोणी येथे १३ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या घटनेने राज्य हादरले