रेल्वे स्थानकावर चालत्या रेल्वेतून २.३० किलो सोने लंपास

अमरावती : रविवारी संध्याकाळी सुमारे ७ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले बडनेरा रेल्वे स्थानकावरून जळगाव कडे निघालेल्या सराफा व्यापाऱ्याच्या बॅगेतील तब्बल २ किलो ३०० ग्रॅम सोने अज्ञात व्यक्तीने चोरून नेले.


सराफा व्यापारी किशोर वर्मा हे दीपावलीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी जळगाव वरून अमरावतीमध्ये व्यापाऱ्यांना दागिने दाखवण्यासाठी आले होते. दिवसभर व्यापार्यांना दागिने दाखवून आणि ऑर्डर घेऊन सायंकाळी ते हावडा-मुंबई मेलने जळगावला परत जाण्यासाठी बडनेरा स्थानकावर पोहोचले.


ट्रेनमध्ये चढताच त्यांची दागिन्यांनी भरलेली बॅग अचानक गायब झालेली त्यांच्या लक्षात आले . बॅगमध्ये २.३० किलो सोने होते. घटनेची माहिती वर्मा यांनी तात्काळ दिली त्यानंतर रेल्वे पोलीस स्टेशन, बडनेरा येथे तक्रार दाखल केली.रेल्वे पोलीसांनी स्थानकाच्या आतील व बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप चोरट्याचा थांगपत्ता लागलेला नाही.


या धाडसी चोरीमुळे अमरावतीतील सराफा व्यवसायामध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रेल्वे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Comments
Add Comment

कबूतराला वाचवताना ठाण्यात मोठी दुर्घटना; हायटेंशन वायरच्या धक्क्याने अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

२८ वर्षीय उत्सव पाटील शहीद; सहकारी गंभीर भाजला, रूग्णालयात उपचार सुरू ठाणे : ठाणे शहरात दिवा-शील रोडवर रविवारी

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : आठवडाभरापासून काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने

साताऱ्यात खळबळ: यशवंत बँकेत ११२ कोटींचा महाघोटाळा; माजी अध्यक्षांसह ५० जणांवर गुन्हा दाखल

बनावट कर्ज, कागदपत्रांमध्ये फेरफार; ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या निधीचा उद्देशबाह्य वापर करून केलेला आर्थिक

पलंगावरुन पडला आणि पोलीस अंमलदाराचा घात झाला

सोलापूर : सोलापूर शहर पोलीस दलातील एका तरुण वाहतूक पोलीस अंमलदाराच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

मुंबईत पावसाची शक्यता कमी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेईल, असा

राज्यातील सरकारी शाळेत मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण

गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे पायाभूत ज्ञान दृढ करण्यावर शासनाने भर दिला आहे. या उद्देशाने