ठाणे-घोडबंदरच्या वाहतूक कोंडीवर मराठी अभिनेत्याची मिश्कील पोस्ट

ठाणे - मुंबई आणि उपनगरांमध्ये माणसांप्रमाणेच वाहनांमध्येही वाढ होत आहे. तसेच शहरांमध्ये सुरू असलेल्या इन्फ्रास्ट्र्क्चरच्या कामांमुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत आहे. या समस्यांवर अनेकदा समाज माध्यमांवर नागरिक रोष व्यक्त करत असतात. अशीच एक पोस्ट मराठी अभिनेता श्रेयस राजने इंस्टाग्रामवर केली आहे. ही पोस्ट ठाणे घोडबंदर येथील वाहतूक कोंडीबद्दल मिश्कीलपणे भाष्य करताना दिसते.


या पोस्टमध्ये अभिनेता श्रेयस राजने लिहले आहे की, “ठाण्यातून बोरिवली किंवा तिकडच्या इतर भागात जायला घोडबंदर रोडचा वापर करू नका. खूप वाहतूक कोंडी आहे. एवढ्या वेळात तुम्ही विमानाने दुबईला पोहोचाल.” यासह श्रेयसने ट्रॅफिक, घोडबंदर रोड आणि ठाणे असे हॅशटॅगही लिहिले आहेत.


ठाणे घोडबंदर हा रोड नेहमीच वाहतुकीमुळे गजबजलेला असतो. पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून या रोडची ओळख आहे. त्यामुळे मुंबई किंवा उपनगरातून ठाण्याच्या बाजूचा प्रवास कमी वेळात करता येतो. मात्र या मार्गावर दिवसाचे २४ तास वाहतूक कोंडी असल्यामुळे प्रवासाला फार वेळ लागतो. त्यामुळे यापूर्वीसुद्धा रोडवरील खड्ड्यांबाबत आणि वाहतूक कोंडीबद्दल अनेक अभिनेता/अभिनेत्रींनी तसेच सामान्य नागरिकांनीही खोचक प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

Comments
Add Comment

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

प्राइम व्हिडिओने ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३ चा दमदार ट्रेलर रिलीज; जुन्या मैत्री आणि नव्या सत्तेमधील संघर्ष उलगडणार

मुंबई : ‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३  चे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे