ठाणे-घोडबंदरच्या वाहतूक कोंडीवर मराठी अभिनेत्याची मिश्कील पोस्ट

ठाणे - मुंबई आणि उपनगरांमध्ये माणसांप्रमाणेच वाहनांमध्येही वाढ होत आहे. तसेच शहरांमध्ये सुरू असलेल्या इन्फ्रास्ट्र्क्चरच्या कामांमुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत आहे. या समस्यांवर अनेकदा समाज माध्यमांवर नागरिक रोष व्यक्त करत असतात. अशीच एक पोस्ट मराठी अभिनेता श्रेयस राजने इंस्टाग्रामवर केली आहे. ही पोस्ट ठाणे घोडबंदर येथील वाहतूक कोंडीबद्दल मिश्कीलपणे भाष्य करताना दिसते.


या पोस्टमध्ये अभिनेता श्रेयस राजने लिहले आहे की, “ठाण्यातून बोरिवली किंवा तिकडच्या इतर भागात जायला घोडबंदर रोडचा वापर करू नका. खूप वाहतूक कोंडी आहे. एवढ्या वेळात तुम्ही विमानाने दुबईला पोहोचाल.” यासह श्रेयसने ट्रॅफिक, घोडबंदर रोड आणि ठाणे असे हॅशटॅगही लिहिले आहेत.


ठाणे घोडबंदर हा रोड नेहमीच वाहतुकीमुळे गजबजलेला असतो. पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून या रोडची ओळख आहे. त्यामुळे मुंबई किंवा उपनगरातून ठाण्याच्या बाजूचा प्रवास कमी वेळात करता येतो. मात्र या मार्गावर दिवसाचे २४ तास वाहतूक कोंडी असल्यामुळे प्रवासाला फार वेळ लागतो. त्यामुळे यापूर्वीसुद्धा रोडवरील खड्ड्यांबाबत आणि वाहतूक कोंडीबद्दल अनेक अभिनेता/अभिनेत्रींनी तसेच सामान्य नागरिकांनीही खोचक प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

Comments
Add Comment

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

प्रसिद्धी, पैसा आणि नावापासून दूर जाऊन ही प्रसिद्ध अभिनेत्री जगतेय संन्यासी आयुष्य!

मुंबई : अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी आणि यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी काही कलाकार मोठा

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल