ठाणे-घोडबंदरच्या वाहतूक कोंडीवर मराठी अभिनेत्याची मिश्कील पोस्ट

ठाणे - मुंबई आणि उपनगरांमध्ये माणसांप्रमाणेच वाहनांमध्येही वाढ होत आहे. तसेच शहरांमध्ये सुरू असलेल्या इन्फ्रास्ट्र्क्चरच्या कामांमुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत आहे. या समस्यांवर अनेकदा समाज माध्यमांवर नागरिक रोष व्यक्त करत असतात. अशीच एक पोस्ट मराठी अभिनेता श्रेयस राजने इंस्टाग्रामवर केली आहे. ही पोस्ट ठाणे घोडबंदर येथील वाहतूक कोंडीबद्दल मिश्कीलपणे भाष्य करताना दिसते.


या पोस्टमध्ये अभिनेता श्रेयस राजने लिहले आहे की, “ठाण्यातून बोरिवली किंवा तिकडच्या इतर भागात जायला घोडबंदर रोडचा वापर करू नका. खूप वाहतूक कोंडी आहे. एवढ्या वेळात तुम्ही विमानाने दुबईला पोहोचाल.” यासह श्रेयसने ट्रॅफिक, घोडबंदर रोड आणि ठाणे असे हॅशटॅगही लिहिले आहेत.


ठाणे घोडबंदर हा रोड नेहमीच वाहतुकीमुळे गजबजलेला असतो. पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून या रोडची ओळख आहे. त्यामुळे मुंबई किंवा उपनगरातून ठाण्याच्या बाजूचा प्रवास कमी वेळात करता येतो. मात्र या मार्गावर दिवसाचे २४ तास वाहतूक कोंडी असल्यामुळे प्रवासाला फार वेळ लागतो. त्यामुळे यापूर्वीसुद्धा रोडवरील खड्ड्यांबाबत आणि वाहतूक कोंडीबद्दल अनेक अभिनेता/अभिनेत्रींनी तसेच सामान्य नागरिकांनीही खोचक प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

Comments
Add Comment

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ चित्रपट चर्चेत; रणवीर, माधवन, रामपाल कोणाची भूमिका साकारतायत?

मुंबई : बॉलिवूडचा ऊर्जावान अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट रिलिजच्या प्रतिक्षेत असून,

सायबर फसवणुकींचे नवे डावपेच: सर्वसामान्यांवर वाढता धोका त्यापासून कसे वाचाल फेडेक्सने काय म्हटले? वाचा ....

मुंबई: सायबर गुन्हे आपल्याला कल्पनाही येणार नाही, इतक्या वेगाने बदलत चालले आहेत आणि घोटाळेबाज आता अत्यंत

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

एसीएमई सोलारकडून १०० मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पातील पुढील १६ मेगावॅटचा दुसरा टप्पा सुरू

गुरुग्राम: एसीएमई सोलर होल्डिंग्ज लिमिटेडने गुजरातमधील सुरेंदरनगर येथे असलेल्या त्यांच्या १०० मेगावॅट पवन

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग

रशिया भारताला एसयू - ५७ लढाऊ विमाने देणार

मॉस्को : रशियाने भारताला एसयू-५७ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ