मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्रांमधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम नियोजनानुसार मंगळवार ०७ ऑक्टोबर , बुधवार ०८ ऑक्टोबर व गुरुवार ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी दररोज दुपारी १२.३० ते ०३.३० वाजेपर्यंत म्हणजेच अडीच तास केले जाणार होते. त्यापैकी मंगळवार व बुधवारी नियोजित कामकाज सफलतापूर्वक पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, गुरुवार ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी महावितरण कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे हे कामकाज पुढे ढकलण्यात आले आहे.


त्यामुळे मुंबई शहर विभागातील ए , बी , एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात संपूर्ण कार्यक्षेत्रात तसेच पूर्व उपनगरातील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील व पूर्व उपनगरातील एल विभाग (कुर्ला पूर्व ), एन विभागात, विक्रोळी, घाटकोपर व घाटकोपर पूर्व, एस विभागात भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व आणि टी विभागात मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्रातील यापूर्वी प्रस्तावित केलेली १० टक्के पाणीकपात रद्द करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार असल्याचे जलअभियंता विभागाने जाहीर केले आहे.

Comments
Add Comment

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार