दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुविधेसाठी 12 हजार विशेष गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर, 4 नवीन रेल्वे प्रकल्पांनाही मान्यता देण्यात आली असून यामधून देशातील रेल्वे सेवा विस्तारित आणि आधुनिकीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले जाणार आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, दिवाळी आणि छटसारख्या सणांच्या काळात देशभरात 1200 विशेष गाड्यांद्वारे एकूण 12 हजार गाड्या चालवल्या जाणार आहेत, जेणेकरून प्रवाशांना गर्दीचा त्रास होणार नाही व प्रवास सुलभ होईल. याशिवाय, आजच्या कॅबिनेट बैठकीत चार नवीन रेल्वे प्रकल्पांनाही मान्यता देण्यात आली असून हे प्रकल्प 3 ते 5 वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅबिनेटच्या निर्णयांची माहिती देताना सांगितले की, भारत आता अमेरिकेला मागे टाकून जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मालवाहतूक करणारा देश ठरला आहे. गेल्या १० वर्षांत रेल्वे क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली आहे. कॅबिनेटच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आलेले 4 नवीन रेल्वे प्रकल्प देशातील महत्त्वाच्या सात रेल्वे कॉरिडॉरवर आधारित आहेत. हे कॉरिडॉर सध्या एकूण रेल्वे वाहतुकीच्या सुमारे 41 टक्के भाराचे वहन करतात.


या कॉरिडॉरमध्ये रेल्वेचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी आणि नवीन मार्ग जोडण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. आता या कॉरिडॉरमध्ये किमान 4 ट्रॅक, आणि शक्य असल्यास 6 ट्रॅक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यांनी सांगितले की, देशात विविध रेल्वे प्रकल्प राबवले जात असताना, लॉजिस्टिक खर्चातही घट होत आहे. आपल्यासारख्या लोकसंख्या व अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने मोठ्या देशांमध्ये रेल्वे प्रणालीवर भर दिला जातो कारण ती पर्यावरणपूरक, ऊर्जासक्षम आणि खर्चबचतीस मदत करणारी आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला