नवी दिल्ली : बॉलीवूड सोबतच आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचीही लोकप्रियता वाढत आहे. जगभर दाक्षिणात्य चित्रपट बघणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
कांतारा या चित्रपटाने जवळपास ४०० कोटींचा गल्ला जमवला. देशात विदेशात सगळीकडेच त्याला लोकांची पसंती मिळाली . त्यातच आता कांतारा चॅप्टर १ हा चित्रपट लोकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट पुराणकथा या विषयाला धरुन असल्याने श्रद्धेचा आणि भावनेचा प्रश्न जपणे आवश्यक होते. या सर्व भावनांचा आदर करत चित्रपटाचा विशेष खेळ राष्ट्रपती भवन येथे होणार आहे.
ऋषभ शेट्टी कांतारा या चित्रपटामुळे घराघरात पोहोचला त्याची चित्रपटातील प्रचंड मेहनत दिसून आली आणि प्रेक्षकांना ती भावली. त्याच्या या उत्कृष्ट कामामुळे मागच्या वर्षीचा उत्कृष्ठ अभिनेता हा राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला. हा चित्रपट राष्ट्रपती भवनात प्रदर्शित होत असल्याने भारतीयांचा चित्रपटसृष्टीविषयीचा आदर वाढला आहे.

कांतारा चॅप्टर १ चित्रपटाविषयी बोलताना अभिनेता ऋषभ शेट्टी याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. या सोबत त्याने त्याच्या काही आठवणीही शेअर केल्या आहेत. तो म्हणतो २०१६ सारखी एक वेळ होती जेव्हा एक शो साठी वाट बघावी लागत होती. पण आता ५००० पेक्षा जास्त सिनेमागृहात शो हाऊसफुल जात आहेत. आणि हा प्रवास प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेम, पाठिंबा, विश्वास आणि देवावरील श्रद्धा याशिवाय अपूर्ण आहे. मी त्या सगळ्यांचे आभार मानतो ज्यामुळे हे सर्व शक्य झाले; असे ऋषभ शेट्टी म्हणाले.
कांतारा चॅप्टर १ ची कमाई
कांतारा चॅप्टर १ चे दिग्दर्शन आणि लेखन स्वतः ऋषभ शेट्टी याने केले आहे. चित्रपटात रुक्मिणी वसंत,गुलशन देवैया,जयराम यांनी काम केले आहे. जगभरातून २५० कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने अवघ्या चार दिवसात हे पैसे कमावले आहेत. आता वीकेंडला हा चित्रपट ५०० कोटींचा टप्पा ओलांडेल असे मत व्यक्त होत आहे.