विरार-सफाळे जलमार्गावर बोट फेऱ्या वाढणार

बंदरे विकास मंत्री नितेश राणेंचे निर्देश


विरार (प्रतिनिधी) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या विरार-सफाळे जलमार्गावर अतिरिक्त नौकेद्वारे वाढीव फेऱ्या सुरू करण्याचे निर्देश राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. या संदर्भात भाजपचे आमदार राजन नाईक यांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन वाढीव नौकेची मागणी केली होती.


मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वसई-विरार शहर व पालघर तालुक्यातील शेकडो प्रवाशांना नौका प्रवास सोयीस्कर पडत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून विरार-मारंबळ पाडा ते सफाळेपर्यंत सुरू झालेल्या या सेवेमुळे वाहनाबरोबरच प्रवाशांनाही प्रवास करणे सोयीचे असल्यामुळे नागरिकांची या सेवेला पसंती मिळाली. मात्र, मर्यादित फेऱ्यांमुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर आणखी अतिरिक्त नौका मंजूर करून वाढीव फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे आमदार राजन नाईक यांनी केली. त्यावर मंत्री नितेश राणे यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच मारंबळपाडा ते सफाळेपर्यंत जादा नौकेतून वाढीव फेऱ्या सुरू होणार आहेत.


तसेच वाढवण बंदरामुळे खारवाडेश्री व नारिंगी येथून मोठ्या प्रमाणावर जहाजांची वाहतूक सुरू होईल. या जहाजांची बांधणी वा दुरुस्तीसाठी पालघर तालुक्यातील खारवाडेश्री व वसई तालुक्यातील नारिंगी येथे कार्गो जेट्टी यार्ड उभारावे, अशी मागणी सुद्धा आमदार नाईक यांनी मंत्री राणे यांच्याकडे केली आहे. याबाबत सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कार्गो जेट्टीसाठी प्रयत्नशील आहोत, असे आमदार राजन नाईक यांनी सांगितले.

Comments
Add Comment

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

प्राइम व्हिडिओने ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३ चा दमदार ट्रेलर रिलीज; जुन्या मैत्री आणि नव्या सत्तेमधील संघर्ष उलगडणार

मुंबई : ‘द वायरल फीवर’ (TVF) निर्मित ‘एस्पिरेंट्स’ सीझन ३  चे दिग्दर्शन दीपेश सुमित्रा जगदीश यांनी केले आहे. या

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे