विरार-सफाळे जलमार्गावर बोट फेऱ्या वाढणार

बंदरे विकास मंत्री नितेश राणेंचे निर्देश


विरार (प्रतिनिधी) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या विरार-सफाळे जलमार्गावर अतिरिक्त नौकेद्वारे वाढीव फेऱ्या सुरू करण्याचे निर्देश राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. या संदर्भात भाजपचे आमदार राजन नाईक यांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन वाढीव नौकेची मागणी केली होती.


मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वसई-विरार शहर व पालघर तालुक्यातील शेकडो प्रवाशांना नौका प्रवास सोयीस्कर पडत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून विरार-मारंबळ पाडा ते सफाळेपर्यंत सुरू झालेल्या या सेवेमुळे वाहनाबरोबरच प्रवाशांनाही प्रवास करणे सोयीचे असल्यामुळे नागरिकांची या सेवेला पसंती मिळाली. मात्र, मर्यादित फेऱ्यांमुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर आणखी अतिरिक्त नौका मंजूर करून वाढीव फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे आमदार राजन नाईक यांनी केली. त्यावर मंत्री नितेश राणे यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच मारंबळपाडा ते सफाळेपर्यंत जादा नौकेतून वाढीव फेऱ्या सुरू होणार आहेत.


तसेच वाढवण बंदरामुळे खारवाडेश्री व नारिंगी येथून मोठ्या प्रमाणावर जहाजांची वाहतूक सुरू होईल. या जहाजांची बांधणी वा दुरुस्तीसाठी पालघर तालुक्यातील खारवाडेश्री व वसई तालुक्यातील नारिंगी येथे कार्गो जेट्टी यार्ड उभारावे, अशी मागणी सुद्धा आमदार नाईक यांनी मंत्री राणे यांच्याकडे केली आहे. याबाबत सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कार्गो जेट्टीसाठी प्रयत्नशील आहोत, असे आमदार राजन नाईक यांनी सांगितले.

Comments
Add Comment

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

तुळशी विवाह २०२५: जाणून घ्या या परंपरेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व!

मुंबई : हिंदू धर्मात तुळशी विवाह हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो घरगुती जीवनातील समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबातील

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींचे ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकली धाड, मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी!

मुंबई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स कारखान्यावर छाप टाकत लाखोंचा माल जप्त करण्यात

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या