बाळाचे नामकरण करण्यासाठी ती घेते २७ लाखांचे मानधन

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : घरात बाळाचे आगमन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. बाळ जन्माला आले की चर्चा असते ती म्हणजे काय नाव ठेवायचे? भारतात, बाळाचे नाव ठेवणे ही नेहमीच कुटुंबातील एक पारंपरिक बाब मानली गेली आहे. आजी-आजोबा किंवा पालक बहुतेकदा एकत्रितपणे मुलाचे नाव ठरवतात. ज्यामध्ये धर्म, ज्योतिष आणि चालीरीती देखील मोठी भूमिका बजावतात; परंतु अमेरिकेतील एका महिलेने हे काम तिच्या उत्पन्नाचे साधन बनवले आहे. सॅन फ्रान्सिस्को येथील टेलर हम्फ्री नावाच्या महिलेने व्यावसायिक नामकरण सल्लागार म्हणून काम सुरू केले आहे. ती अनोखी, वेगळी आणि लक्षात राहणारी नावे सुचवते आणि म्हणूनच आपल्या मुलाचे नाव इतरांपे्रा वेगळे असावे, असे वाटणारे श्रीमंत कुटुंबातील आई-वडील बाळाला खास नाव देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तिच्याकडे येतात.


न्यूयॉर्क पोस्टमधील एका वृत्तानुसार, टेलरने हे काम २०१८ मध्ये सुरू केले. त्यावेळी ती फक्त १०० डॉलर्स (८,००० रुपये) मध्ये नाव सुचवत असे. त्यानंतर एका पार्टीतील उद्योजकांसोबत तिचे बोलणे झाले, तेव्हा उद्योजकांनी महिलेला तिचे दर वाढवण्यास सांगितले. प्रसिद्ध न्यूयॉर्कर मासिकात टेलरची कथा प्रकाशित झाल्यानंतर तिच्याकडे कामाचा पूर आला. काही वेळातच तिचा छोटासा उपक्रम मोठ्या व्यवसायात रूपांतरित झाला. आता नवजात बालकांना नाव सुचवण्यासाठी टेलर १७ हजार रुपयांपासून २७ लाख रुपयांपर्यंत मानधन घेते.


मानधनानुसार महिला नाव सुचवते, जर कोणी लहान पॅकेज घेत असेल तर टेलर ई-मेलद्वारे काही नावे सुचवते. पण मोठा पॅकेज घेणाऱ्या ग्राहकांसाठी ती खूप सखोल संशोधन करते. त्या कुटुंबाचा देश, परंपरा, पालकांच्या अपेक्षा आणि नावाने मुलाची भविष्यात कशी ओळख निर्माण होईल, या सगळ्याचा अभ्यास करते. आतापर्यंत टेलर हिने ५०० पेक्षा अधिक मुलांसाठी नावे सुचवली आहे. सोशल मीडियावरदेखील तिला लाखो लोक फॉलो करतात. टेलर म्हणते, “एक नाव फक्त उच्चारण्यासाठी नसते, ते नावच पुढे जाऊन मुलाची ओळख बनते. त्यामुळे विचार करून खास नावाची निवड केली पाहिजे.”

Comments
Add Comment

यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमा ? जाणून घ्या या तिथीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

कोजागिरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणार भारतीय हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा दिवस आहे. आणि इंग्रजी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूणमध्ये पुराचा धोका

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण शहराला असलेल्या पुराच्या धोक्याबाबत उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा

मंत्री नितेश राणेंचा वैभववाडीत उबाठावर मोठा घाव!

मंगेश लोकेंसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश ओरोस (वार्ताहर) : वैभववाडी तालुक्यात उद्धव

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

रायगड जिल्हा परिषदेत २ हजार ६०९ पदे रिक्त

अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विकासाला गती देण्याचे काम रायगड जिल्हा परिषदेचे असले, तरी जिल्हा परिषदेत

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील