फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी घडतात, घडलेल्या कित्येक गोष्टींमुळे मानसिक त्रास होतो. डोक्यात विचारांचे चक्र सुरू राहते. मानसिक त्रास कालांतराने शरीरावरही दिसू लागतात. झोपेवरही वाईट परिणाम होतात. दमल्यानंतर छान गाढ झोप लागेल असं वाटतं पण काही वेळा संपूर्ण रात्र या कुशीवरून त्या कुशीवर हीच गोष्ट सुरू राहते; काही केल्या झोप लागत नाही. सकाळ होताच झोप पूर्ण झालीच नाही, असे अनेकांना वाटतं. रात्री उशिरापर्यंत मोबाईल-लॅपटॉपचा वापर करणे, कामाचा ताण यासह अन्य गोष्टींचा झोपेवर परिणाम होतोय. या परिस्थितीस लोक ‘स्लीप एपिडेमिक’ म्हणत आहेत. आठ तासांची गाढ झोप आताच्या काळात महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट मानली जात आहे. याच शोधामुळे स्लीप टुरिझम हा नवा ट्रेंड उदयास आलाय व तो जगभरात वाढतही आहे.

‘स्लीप टुरिझम’ म्हणजे जेथे तुमचे प्राधान्य केवळ चांगली झोप मिळेल तेथे प्रवास करावा. पूर्वी हॉटेलमध्ये केवळ आरामदायी पलंग उपलब्ध असायचे; पण स्लीप टुरिझमच्या माध्यमातून संपूर्ण प्रवास तुमची झोप सुधारण्याच्या द़ृष्टीने डिझाईन केला जातो. आठवडाभर झोपेसाठी जागा उपलब्ध करून दिल्या जातात. काही ठिकाणी वैद्यकीय कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. काही ठिकाणी झोपेसाठी आवश्यक असणार्या स्पा ट्रीटमेंटही मिळतात.
पूर्वी लोक निरोगी आरोग्यासाठी केवळ आहार आणि व्यायामाची काळजी घेत होते; पण आता झोपेसही तितकेच महत्त्व दिले जातेय. एका सर्वेक्षणानुसार, भारतामध्ये ६१ टक्के लोक सहा तासांहून कमी तास झोपतात. या पार्श्वभूमीवर स्लीप टुरिझममुळे लोक तणावापासून दूर होऊन स्वतःशी जोडले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. भारतातही अनेक लोक या कारणामुळे हिमालयाच्या किंवा केरळच्या निसर्गरम्य ठिकाणी जात असल्याचे दिसून आले आहे.
Comments
Add Comment

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना