
कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत सर्वबाद २४७ धावा केल्या. पाकिस्तानपुढे जिंकण्यासाठी २४८ धावांचे आव्हान आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यास भारत गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर पोहोचणार आहे. विश्वचषकात भारताचा पहिला साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध झाला. हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने ५९ धावांनी जिंकला. पाकिस्तान विरुद्धचा सामना हा भारताचा दुसरा साखळी सामना आहे. हा सामना जिंकल्यास चार गुणांसह भारत गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर पोहोचणार आहे. सध्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ तीन गुणांसह पहिल्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला आणि श्रीलंकेविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे तीन गुणांसह ऑस्ट्रेलिया गुणतक्त्यात पहिल्या स्थानी आहे.

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्याच्या नाणेफेकीवेळी दोन्ही संघांच्या कर्णधार ...
भारताकडून हरलीन देओलने सर्वाधिक ४६ धावा केल्या. यष्टीरक्षक रिचा घोष ३५ धावा करुन नाबाद राहिली. जेमिमा रॉड्रिग्जने ३२ आणि प्रतिका रावलने ३१ धावा केल्या. दीप्ती शर्माने २५, स्मृती मंधानाने २३, स्नेह राणाने २० धावा केल्या. कर्णधार असलेल्या हरमनप्रीत कौरने १९, क्रांती गौडने ८, श्री चरणीने १, रेणुका सिंग ठाकूरने शून्य धावा केल्या. पाकिस्तानकडून डायना बेगने चार, कर्णधार असलेल्या फातिमा सना आणि सादिया इक्बालने प्रत्येकी दोन तर रमीन शमीम आणि नशरा संधूने प्रत्येकी एक बळी घेतला.

कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लीग सामन्यात टॉस ...
भारतीय महिला क्रिकेट संघ : प्रतिका रावल , स्मृती मानधना , हरलीन देओल , हरमनप्रीत कौर (कर्णधार) , जेमिमाह रॉड्रिग्स , रिचा घोष (यष्टीरक्षक) , दीप्ती शर्मा , स्नेह राणा , रेणुका सिंग ठाकूर , क्रांती गौड , श्री चरणी
पाकिस्तानचा महिला क्रिकेट संघ : मुनीबा अली , सदाफ शमास , सिद्रा अमीन , रमीन शमीम , आलिया रियाझ , सिद्रा नवाज (यष्टीरक्षक) , फातिमा सना (कर्णधार) , नतालिया परवेझ , डायना बेग , नशरा संधू , सादिया इक्बाल