रिया चक्रवर्तीला दिलासा: मुंबई उच्च न्यायालयाने पासपोर्ट परत करण्याचे दिले आदेश!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिलेआहे. हा पासपोर्ट २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित अंमली पदार्थ प्रकरणात जप्त करण्यात आला होता. या प्रकारणांनंतर तब्बल ५ वर्षांनी रियाला तिचा पासपोर्ट परत मिळणार आहे.


न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने रियाच्या हेतूंवर शंका घेण्याचे काहीही कारण नसल्याचे नमूद करत, तिला पासपोर्ट परत मिळावा असा निर्णय दिला. मात्र, न्यायालयाने काही अटींसह पासपोर्ट परत देण्याचे आदेश दिले आहेत.



कोणत्या अटी घालण्यात आल्या?


प्रत्येक सुनावणीला रियाने हजर राहणे बंधनकारक आहे, विशेष सूट मिळाली तरच अनुपस्थित राहता येईल.


विदेश प्रवासाच्या आधी किमान चार दिवस आधी तिने प्रवासाचा तपशील (फ्लाइट आणि हॉटेल्सची माहिती) सरकारी वकिलांना कळवणे आवश्यक आहे.


तिने मोबाईल क्रमांक तपास संस्थांना द्यावा, मोबाईल सतत सुरू ठेवावा, आणि परदेशातून परतल्यानंतर तात्काळ माहिती द्यावी.



रिया चक्रवर्तीची भावना: "धीर हा माझा पासपोर्ट होता"


न्यायालयाच्या निर्णयानंतर, रियाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा पासपोर्ट हातात धरलेला फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली. ती म्हणाली “गेल्या पाच वर्षांपासून धीर हाच माझा एकमेव पासपोर्ट होता. अनेक संघर्ष, निरंतर आशा... आज पुन्हा माझ्या हातात माझा पासपोर्ट आहे. माझ्या पुढच्या मी प्रवासासाठी सज्ज आहे! सत्यमेव जयते.”





या पोस्टवर करिश्मा तन्ना, फातिमा सना शेख आणि विक्रांत मेस्सी यांसारख्या कलाकारांनी तिला अभिनंदन केले.


रिया चक्रवर्तीला व्यावसायिक कामांसाठी परदेशात जाण्याची गरज असून पासपोर्ट जप्त झाल्यामुळे ती संधी गमावत होती. त्यामुळे तिने नवीन अर्ज करून पासपोर्ट परत मागितला होता. तिच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, रियाने सर्व न्यायालयीन अटींचे पालन केले असून ती पुढेही नियम पाळेल.


जून २०२० रोजी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू नंतर सुरू झालेल्या ड्रग्ज चौकशीत, (NCB) ने सप्टेंबर २०२० मध्ये रियाला अटक केली होती. त्यावेळी तिचा पासपोर्ट जप्त करण्यात आला होता आणि जामीनाच्या अटींमध्ये पासपोर्ट जमा करण्याची अट होती.


ह्या निर्णयामुळे रियाला पुन्हा तिच्या व्यावसायिक आयुष्याला गती मिळण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

PATRAPATRI : ‘पत्रापत्री’ शब्दांची जादू आणि मैत्रीच्या आठवणींचा शंभर प्रयोगांचा यशस्वी प्रवास!

Vijay Kenkre and Dilip Prabhavalkar : सांस्कृतिक विश्वात गेल्या दोन वर्षांत ज्या एका प्रयोगाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, तो

CINTAA : रणवीर सिंग-फरहान अख्तर वादावर CINTAA अध्यक्ष पूनम ढिल्लों यांची स्पष्टोक्ती; 'कलाकारांना कामगार म्हणून अधिकृत मान्यता मिळवणे हेच आमचे ध्येय'

NAVI MUMBAI : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील अलीकडील वादाच्या पार्श्वभूमीवर CINTAA च्या अध्यक्षा

Bharat Bhagy Vidhata Movie:  ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटावर नर्सेस संघटनेचा आक्षेप; प्रदर्शनापूर्वीच निर्माण झाला वाद

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) आगामी ‘भारत भाग्य विधाता’ (Bharat Bhagy Vidhata) हा चित्रपट सध्या चर्चेत असून

'Deool Band 2' Box Office Collection : मराठी सिनेमाचा नवा विक्रम? 'देऊळ बंद २'ची १०० कोटींच्या दिशेने दमदार वाटचाल!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित आणि अभिनित 'देऊळ बंद २' (Deool Band 2) चित्रपटाची जोरदार

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

रंगात आलेला प्रयोग राजवाडेंनी थांबवला; कारण...

नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे.