
caठाणे (वार्ताहर) : शहरभर नवरात्री आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने धाव घेतली. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) गुरुवारी दुपारपर्यंत १०५ तर नवरात्री काळात ४ हजार २२६ दुचाकी चारचाकी वाहनांची नोंद झाली. शुभ दिन म्हणून मानल्या जाणाऱ्या या दिवसात वाहन विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र यंदाही दिसून आले. सकाळपासूनच शहरातील विविध वाहन वितरकांच्या दुकानात वाहन खरेदी इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. नवीन गाडी घेऊन नागरिक मुहूर्त साधण्यासाठी येत होते. अनेक वाहन वितरकांनी त्यासाठी विशेष काऊंटर, वाहन ताब्यात देण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी आणि संगणकीय नोंदणीसाठी वेगळी सोय उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे अर्जदारांना कुठल्याही अडचणीशिवाय सेवा मिळाली.
काही शोरूमसमोर सजवलेल्या नव्या गाड्यांची रांग लागली होती. ग्राहकांनी आपल्या कुटुंबियांसोबत गाडी खरेदी करून ती देवळात नेऊन तिची पूजा केली. शासनाच्या वाहन नोंदणीबाबतच्या नियमानुसार, वाहन वितरकाने नोंदणी केल्यावर वाहनास त्या नोंदणी क्रमांकाची
हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) लावूनच वाहन मालकाच्या ताब्यात देणे आवश्यक आहे. त्यामुळे बहुतांश वाहन मालकांनी १-२ आठवड्यापूर्वीच वाहन बुक करून त्या वाहनाची डिलीवरी आज घेतली. त्यामध्ये विशेष वाहन क्रमांक आरक्षित करणाऱ्या वाहन मालकांची संख्या जास्त आहे.
दसरा गेल्या काही महिन्यांपासून बाजारात मंदीचे वातावरण असतानाही नवरात्री, आणि दिवाळीचा सण हा नेहमीच ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी हंगामी पर्वणी ठरतो. यंदाही ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी वाहन खरेदीला मोठा प्रतिसादeler दिला. दुचाकी वाहनांना कायमच मागणी असते, मात्र यंदा चारचाकी गाड्यांमध्येही वाढलेली नोंदणी पाहायला मिळाली.
आरटीओ सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नवरात्री आणि दसऱ्याच्या एका दिवसात वाहनांची नोंदणी होणं ही लक्षणीय वाढ आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आकडा अधिक असल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन विक्रेते आणि आरटीओ प्रशासन यांच्या मते, सणासुदीच्या काळात आणखी वाहन विक्री वाढण्याची चिन्हे आहेत. विशेषतः दिवाळीपर्यंत विक्रीचा आकडा दुप्पट होण्याची शक्यता आहे.
२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर काळात ठाणे आरटीओमध्ये झालेली वाहनाची नोंदणी
मोटर सायकल २ हजार ४८२
चार चाकी (कार) १ हजार ८
इतर ७३६