आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश


आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये बुडाले. यामधील दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर एका तरुणाला वाचवण्यात यश आले आहे. या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेपत्ता झालेल्या इतर तरुणांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी धाव घेतली असून ते बेपत्ता तरुणांचा शोध घेत आहेत.


आग्रा येथील खेरागड भागातील एक कुटुंब गुरुवारी विजयादशमीनिमित्त दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी उंटगन नदीत गेले होते. कुटुंबातील काही तरुण मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नदीत उतरले. अचानक त्यांचा तोल गेला आणि ६ तरुण नदीत बुडाले. या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. एका तरुणाला वाचवण्यात यश आले, तर इतर जणांचा शोध घेतला जात आहे.


या घटनेपूर्वी उत्तर प्रदेशच्या आझमगड येथे देखील अशीच घटना घडली. दुर्गा मातेच्या विसर्जनादरम्यान एका मुलाचा पाय घसरला व तो बेसो नदीमध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा छोटा भाऊ, काका व गावातील एका व्यक्तीने नदीमध्ये उडी मारली. हे सर्वजण नदीमध्ये बुडाले. नदीत बुडालेल्या या सर्वांना गावकऱ्यांनी वाचवले व सुरक्षित नदीतून बाहेर काढले. पण नदीत बुडून सीकू नावाच्या मुलाचा मृत्यू झाला. एका तासानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Comments
Add Comment

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे

इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या

Budget 2026 : ‘विकसित भारताच्या दिशेने दमदार पाऊल’; केंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई : देशाचा २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026 ) सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र

Budget 2026 : मच्छिमारांसाठी आनंदाची बातमी! खुल्या समुद्रातील मासेमारी आता 'करमुक्त'; निर्यातीला मिळणार मोठी गती

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात देशातील ग्रामीण

Budget 2026 : कोकणचा काजू-नारळ सातासमुद्रापार जाणार! अर्थमंत्र्यांचा 'हाय-व्हॅल्यू' शेतीवर भर; कोकणकर होणार मालामाल

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केलेल्या ऐतिहासिक नवव्या