आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश


आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये बुडाले. यामधील दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर एका तरुणाला वाचवण्यात यश आले आहे. या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेपत्ता झालेल्या इतर तरुणांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी धाव घेतली असून ते बेपत्ता तरुणांचा शोध घेत आहेत.


आग्रा येथील खेरागड भागातील एक कुटुंब गुरुवारी विजयादशमीनिमित्त दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी उंटगन नदीत गेले होते. कुटुंबातील काही तरुण मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नदीत उतरले. अचानक त्यांचा तोल गेला आणि ६ तरुण नदीत बुडाले. या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. एका तरुणाला वाचवण्यात यश आले, तर इतर जणांचा शोध घेतला जात आहे.


या घटनेपूर्वी उत्तर प्रदेशच्या आझमगड येथे देखील अशीच घटना घडली. दुर्गा मातेच्या विसर्जनादरम्यान एका मुलाचा पाय घसरला व तो बेसो नदीमध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा छोटा भाऊ, काका व गावातील एका व्यक्तीने नदीमध्ये उडी मारली. हे सर्वजण नदीमध्ये बुडाले. नदीत बुडालेल्या या सर्वांना गावकऱ्यांनी वाचवले व सुरक्षित नदीतून बाहेर काढले. पण नदीत बुडून सीकू नावाच्या मुलाचा मृत्यू झाला. एका तासानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर

..तर पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकू - राजनाथ सिंह

जयपूर : पाकिस्तानने जर सर क्रीक परिसरात कोणतीही आक्रमकता दाखवली तर त्याचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला जाईल, असे