आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश


आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये बुडाले. यामधील दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर एका तरुणाला वाचवण्यात यश आले आहे. या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेपत्ता झालेल्या इतर तरुणांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी धाव घेतली असून ते बेपत्ता तरुणांचा शोध घेत आहेत.


आग्रा येथील खेरागड भागातील एक कुटुंब गुरुवारी विजयादशमीनिमित्त दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी उंटगन नदीत गेले होते. कुटुंबातील काही तरुण मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नदीत उतरले. अचानक त्यांचा तोल गेला आणि ६ तरुण नदीत बुडाले. या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. एका तरुणाला वाचवण्यात यश आले, तर इतर जणांचा शोध घेतला जात आहे.


या घटनेपूर्वी उत्तर प्रदेशच्या आझमगड येथे देखील अशीच घटना घडली. दुर्गा मातेच्या विसर्जनादरम्यान एका मुलाचा पाय घसरला व तो बेसो नदीमध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा छोटा भाऊ, काका व गावातील एका व्यक्तीने नदीमध्ये उडी मारली. हे सर्वजण नदीमध्ये बुडाले. नदीत बुडालेल्या या सर्वांना गावकऱ्यांनी वाचवले व सुरक्षित नदीतून बाहेर काढले. पण नदीत बुडून सीकू नावाच्या मुलाचा मृत्यू झाला. एका तासानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.