Mohsin Naqvi On Asia Trophy Ind vs Pak : अखेर BCCI समोर झुकला नक्वी! ट्रॉफी घेऊन पळणाऱ्या नक्कावींचा माज उतरला, नक्की काय म्हणाला मोहसीन नक्वी?

दुबई : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी अखेर बीसीसीआय (BCCI) समोर हात जोडले. काल दुबईत झालेल्या आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर हा मोठा आणि अनपेक्षित प्रकार घडला आहे. एसीसीचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या मोहसीन नक्वी यांनी बैठकीनंतर थेट बीसीसीआयकडे माफी मागितली. दोन देशांच्या क्रिकेट बोर्डांमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या अध्यक्षांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे क्रिकेट जगतात चर्चांना उधाण आले आहे.



बीसीसीआयसमोर झुकला नक्वी


आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या दुबईतील बैठकीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी बीसीसीआयकडे माफी मागून संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. आशिया चषक स्पर्धेदरम्यान झालेल्या एका अप्रिय घटनेबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. मोहसीन नक्वी यांनी बीसीसीआयला माफी मागताना नम्रपणे आपले म्हणणे मांडले, "आशिया चषकाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात जे झाले, त्याबद्दल मी माफी मागतो. जे झाले ते व्हायला नको होते." "आपण आता नव्याने सुरुवात करू आणि क्रिकेटला मोठं करू." संबंध सुधारण्याच्या दृष्टीने आणि cordial वातावरण निर्माण करण्यासाठी मोहसीन नक्वी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव याला खास आमंत्रण दिले. "भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दुबईत स्वतः येऊन आशिया चषक आणि पदकं न्यावी," असे आवाहन मोहसीन नक्वी यांनी केले. या भूमिकेमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने क्रिकेटच्या राजकारणापेक्षा खेळाला महत्त्व देण्याचा संदेश दिला आहे.



'राजकारण की क्रिकेट?' मोहसीन नक्वींवर शाहिद अफ्रिदीचा निशाणा


पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि खेळाडू शाहिद अफ्रिदी (Shahid Afridi) याने नक्वींच्या दुहेरी भूमिकेवर (Dual Role) थेट निशाणा साधला आहे. मोहसीन नक्वी हे पीसीबी अध्यक्षपदासोबतच पाकिस्तानचे गृहमंत्रीपदही सांभाळत असल्याने हा वाद निर्माण झाला आहे. शाहिद अफ्रिदीने मोहसीन नक्वी यांना स्पष्ट विनंती केली आहे. तो म्हणाला, "मोहसीन नक्वी यांना माझी विनंती आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद आणि पाकिस्तानचे गृहमंत्रीपद ही दोन्ही अतिशय महत्त्वाची पदे आहेत आणि ही मोठी कामे आहेत, ज्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो." पीसीबी आणि गृह मंत्रालय हे दोन्ही विभाग पूर्णपणे वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि राजकारण यापैकी एकाची निवड करावी. मोहसीन नक्वी यांच्यासाठी हा निर्णय घेणे सोपे नाही, हे मान्य करत अफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेटच्या गरजांवर लक्ष वेधले. अफ्रिदीच्या मते, सध्या पाकिस्तान क्रिकेटला विशेष लक्ष आणि पूर्ण वेळेची आवश्यकता आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मोहसीन नक्वी केवळ सल्लागारांवर अवलंबून राहू शकत नाहीत. क्रिकेटच्या भल्यासाठी त्यांनी स्वतः सक्रिय आणि पूर्णवेळ लक्ष देणे गरजेचे आहे.



आशिया चषकाच्या फायनलनंतर नेमकं काय घडलं?


२८ सप्टेंबर रोजी झालेल्या आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. मात्र, या विजयानंतर दुबईच्या मैदानावर ट्रॉफीवरून मोठा वाद आणि गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. सामना संपल्यानंतर जेव्हा पारितोषिक वितरण सोहळा सुरू झाला, तेव्हा हा वाद उफाळून आला. आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री असलेले मोहसीन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघाने स्पष्ट नकार दिला. या भूमिकेमुळे मोठा पेच निर्माण झाला. त्यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन मैदानाच्या बाहेर निघून गेले. अंतिम सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघाला अद्याप अधिकृतपणे ट्रॉफी मिळालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या