पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली सात पर्यटन स्थळे खुली

नवी दिल्ली  : जम्मू-काश्मीर प्रशासनाने सोमवारी (दि. २९) काश्मीर खोऱ्यातील सात प्रमुख पर्यटन स्थळे पुन्हा खुली केली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून ही स्थळे बंद करण्यात आली होती. शुक्रवारी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या युनिफाइड हेडक्वार्टरच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला होता. सोमवारच्या बैठकीत सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर जम्मू आणि काश्मीर विभागांमधील तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली काही पर्यटन स्थळे पुन्हा उघडण्याचे आदेश देण्यात आले.


२२ एप्रिल रोजी पहलगाममधील बायसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतांश पर्यटक होते. या हल्ल्यानंतर प्रशासनाने सुमारे ५० पर्यटन स्थळे बंद केली होती. काश्मीरमध्ये पुन्हा सुरू झालेल्या सात पर्यटन स्थळांमध्ये आडू व्हॅली, राफ्टिंग पॉइंट यन्नर, अक्कड पार्क, पादशाही पार्क, कमान पोस्ट यांचा समावेश आहे.


जम्मू विभागातील डगन टॉप (रामबन), धग्गर (कठुआ), शिव गुंफा (सालाल, रियासी) ही पर्यटन स्थळे देखील पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. यापूर्वी जून महिन्यात प्रशासनाने १६ अन्य पर्यटन स्थळेही पुन्हा सुरू केली होती, ज्यात पहलगाममधील काही भागांचाही समावेश होता.

Comments
Add Comment

तामिळनाडू चेंगराचेंगरी : नड्डांकडून एनडीए शिष्टमंडळ स्थापन, श्रीकांत शिंदेंचाही समावेश

नवी दिल्ली : तामिळनाडूच्या करूरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी तीव्र दु:ख

भाजपचे दिल्लीशी विश्वासाचे, भावनेचे नाते; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा

नवी दिल्ली : दिल्ली आणि भाजपाचे नाते खूप जुने आहे. सेवा, संस्कार आणि सुख-दुःखाचे साथीदार असलेले हे शहर आहे. जनसंघ

पाक व्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका! शहाबाज शरीफ सरकारविरूद्ध लोकं उतरली रस्त्यावर

नवी दिल्ली : पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सोमवारी पाकिस्तान सरकारविरूद्ध मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर

नक्षलवाद्यांसोबत शस्त्रसंधी अमान्य, अमित शाहांनी फेटाळला प्रस्ताव

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात सुरक्षा पथकांनी देशातील नक्षलवाद ३१ मार्च २०२६

PoK : ३००० पाकिस्तानी सैनिक तैनात, इंटरनेट आणि फोन सेवा बंद; PoK मध्ये नेमकं काय शिजतंय?

मुजफ्फराबाद : पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सध्या मोठी राजकीय आणि सामाजिक उलथापालथ होत आहे. स्थानिक नागरिक आणि

IND vs PAK: मैदानावरही ऑपरेशन सिंदूर!' पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर विजयानंतर केले खास ट्विट

नवी दिल्ली: भारताने आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून ९व्यांदा विजेतेपद पटकावल्यानंतर