ICC Womens World Cup 2025: भारत-श्रीलंका सामन्याने होणार वर्ल्डकपची सुरूवात, ८ संघादरम्यान रंगणार महामुकाबला

मुंबई: आशिया कप २०२५ संपल्यानंतर आता महिला क्रिकेट महाकुंभाची सुरूवात होत आहे. आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपची सुरूवात ३० सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून होत आहे. फायनलचा सामना २ नोव्हेंबरला होईल. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा भारतीय महिला संघाला होणार आहे. भारतीय महिला संघ मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध वनडे वर्ल्डकप २०२५मधील पहिला सामना खेळण्यास उतरतील. संघाचे लक्ष्य हे ४७ वर्षांनी पहिला आयसीसीचा खिताब जिंकणे आहे.


जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या हरमनप्रीतच्या नेतृत्वातील संघाला घरच्या मैदानांवर खेळण्याचा अनुभव आहे तसेच सध्या महिला संघ जबरदस्त फॉर्मात आहे. त्यामुळे याचा ते फायदा नक्की उचलतील. हा १३वा महिला क्रिकेट वर्ल्डकप आहे आणि भारतात १२ वर्षांनी आयोजित होत आहे. स्पर्धेत २८ सामने खेळले जातील. यातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ५ ऑक्टोबरला रंगणार आहे. स्पर्धेचा सेमीफायनल आणि संभाव्य फायनल भारतात खेळवला जाईल.


भारतीय संघाचा फॉर्म उत्साहजनक आहे. सध्या संघाने इंग्लंडला वनडे आणि टी-२० मालिकेत हरवले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाची मालिका खंडित केली. कर्णधार हरमनप्रीत मोठ्या स्पर्धंमध्ये चांगली कामगिरी करते. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक आणि इंग्लंडविरुद्ध शतक ठोकले होते. दुखापतीतून सावरलेली जेमिमाही फॉर्ममध्ये आहे.


स्पर्धेत सामील संघ


ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांग्लादेश आणि पाकिस्तान



विश्वचषक स्पर्धेचे स्वरूप:


या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी आहेत.

'राउंड रॉबिन' (Round Robin) फॉरमॅटनुसार प्रत्येक संघ एकमेकांशी एक-एक सामना खेळेल.

गुवाहाटी, इंदूर, विशाखापट्टणम आणि नवी मुंबई (भारत) तसेच कोलंबो (श्रीलंका) या पाच मैदानांवर सामने खेळवले जातील.

पॉइंट्स टेबलमधील अव्वल ४ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

स्पर्धेचा अंतिम सामना २ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबई किंवा कोलंबो येथे होणार आहे.
Comments
Add Comment

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५०

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आलेली आहे . टॉप खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत.

Fruad In Cricket : क्रिकेटविश्वातला महाघोटाळा, एकाच पत्त्यावर आढळले १२ खेळाडू

पुद्दुचेरी : भारतीय क्रिकेटचा जागतिक पातळीवर दबदबा आहेच. बीसीसीआयची आर्थिक ताकद, आयपीएलसारख्या जगातील सर्वात