ICC Womens World Cup 2025: भारत-श्रीलंका सामन्याने होणार वर्ल्डकपची सुरूवात, ८ संघादरम्यान रंगणार महामुकाबला

मुंबई: आशिया कप २०२५ संपल्यानंतर आता महिला क्रिकेट महाकुंभाची सुरूवात होत आहे. आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपची सुरूवात ३० सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून होत आहे. फायनलचा सामना २ नोव्हेंबरला होईल. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा भारतीय महिला संघाला होणार आहे. भारतीय महिला संघ मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध वनडे वर्ल्डकप २०२५मधील पहिला सामना खेळण्यास उतरतील. संघाचे लक्ष्य हे ४७ वर्षांनी पहिला आयसीसीचा खिताब जिंकणे आहे.


जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या हरमनप्रीतच्या नेतृत्वातील संघाला घरच्या मैदानांवर खेळण्याचा अनुभव आहे तसेच सध्या महिला संघ जबरदस्त फॉर्मात आहे. त्यामुळे याचा ते फायदा नक्की उचलतील. हा १३वा महिला क्रिकेट वर्ल्डकप आहे आणि भारतात १२ वर्षांनी आयोजित होत आहे. स्पर्धेत २८ सामने खेळले जातील. यातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ५ ऑक्टोबरला रंगणार आहे. स्पर्धेचा सेमीफायनल आणि संभाव्य फायनल भारतात खेळवला जाईल.


भारतीय संघाचा फॉर्म उत्साहजनक आहे. सध्या संघाने इंग्लंडला वनडे आणि टी-२० मालिकेत हरवले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाची मालिका खंडित केली. कर्णधार हरमनप्रीत मोठ्या स्पर्धंमध्ये चांगली कामगिरी करते. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक आणि इंग्लंडविरुद्ध शतक ठोकले होते. दुखापतीतून सावरलेली जेमिमाही फॉर्ममध्ये आहे.


स्पर्धेत सामील संघ


ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांग्लादेश आणि पाकिस्तान



विश्वचषक स्पर्धेचे स्वरूप:


या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी आहेत.

'राउंड रॉबिन' (Round Robin) फॉरमॅटनुसार प्रत्येक संघ एकमेकांशी एक-एक सामना खेळेल.

गुवाहाटी, इंदूर, विशाखापट्टणम आणि नवी मुंबई (भारत) तसेच कोलंबो (श्रीलंका) या पाच मैदानांवर सामने खेळवले जातील.

पॉइंट्स टेबलमधील अव्वल ४ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

स्पर्धेचा अंतिम सामना २ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबई किंवा कोलंबो येथे होणार आहे.
Comments
Add Comment

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन

BCCI Update on Shubman Gill Injury : गिलची प्रकृती चिंताजनक? ९ विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCI ने काय खुलासा केला?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगतदार

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर