कल्पना एक...’चे  अस्तित्त्व अंतिम टप्प्यात...


एकांकिकांच्या विश्वात विशेष स्थान राखून असलेल्याअस्तित्त्व’ या संस्थेच्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पर्धेचा प्रवास आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ ही स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थी; तसेच हौशी आणि व्यावसायिक रंगकर्मींना त्यांचा कलाविष्कार सादर करण्यासाठी दरवर्षी रंगमंच उपलब्ध करून देते. गेली तब्बल ३९ वर्षे ही स्पर्धा गाजत आहे आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक रंगकर्मी उदयास आले आहेत. मात्र यंदाची स्पर्धा ही या प्रवासातली ‘शेवटापूर्वीची आवृत्ती’ असल्याचे सूतोवाच या स्पर्धेच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे. ‘अस्तित्त्व’ या संस्थेला आता ३० वर्षे झाली आहेत आणि ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ ही स्पर्धा आता चाळीशीच्या उंबरठ्यावर उभी असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे, ‘अस्तित्त्व’ या संस्थेतर्फे या संदर्भात स्पष्ट करण्यात आले आहे.


दरम्यान, यंदा या स्पर्धेची प्राथमिक फेरी २७ व २८ सप्टेंबर रोजी होत असून, अंतिम फेरी ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यंदा या स्पर्धेचे ‘कल्पना सूचक’ ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ आहेत. कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या ‘विदूषक’ या कवितेतल्या काही ओळी कल्पना म्हणून त्यांनी सुचवल्या आहेत. अशोक सराफ यांनी या विषयाला अनुसरून कोणतीही विस्तृत प्रस्तावना दिलेली नाही. मात्र, हा विषय इतका प्रभावी आहे की तो लेखकांना आपोआप स्फूर्ती देईल, असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. साहजिकच, आता या विषयावर सादर होणाऱ्या एकांकिका म्हणजे लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांसाठी आव्हानात्मक गोष्ट असून, सदर विषय नव्या दमाचे रंगकर्मी कशा पद्धतीने मांडतात; हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  -राज चिंचणकर



Comments
Add Comment

नाटकाच्या प्रयोगासाठी ‘उदकशांत’ करताना...

राजरंग : राज चिंचणकर नाटक हे नाटक असते आणि नाटकांच्या बाबतीत व्यावसायिक व प्रायोगिक असा भेदभाव केला जाऊ नये, अशी

‘गोदावरी’तील समावेश कलाटणी देणारा

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल गौरी नलावडे या अभिनेत्रीचा ‘वडा पाव’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. गौरीचे शालेय

कलात्मक दिग्दर्शक गुरुदत्त

गुरुदत्त हिंदी चित्रपटसृष्टीत जिवंतपणीच आख्यायिका बनलेले व्यक्तिमत्त्व. आजही गुरुदत्त यांचे नाव घेतले की

नाईलाजांच्या प्रदेशातील तीन डिसेबल्स

पाचवा वेद : भालचंद्र कुबल यालेखाचं शीर्षक मुद्दामहून हेच ठेवण्यामागचं कारण असं की परीक्षक म्हणून एकदा का तुम्ही

नाईलाजाच्या प्रदेशातील तीन डिसेबल्स

भालचंद्र कुबल यंदाच्या आय. एन. टी. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. मी या स्पर्धेत

मराठी रंगभूमीचा एकमेव ‘सूत्रधार’...

रंगभूमीवर नाटकांचे सूत्रधार अनेक असतात, पण मराठी रंगभूमीला एखादा सूत्रधार असू शकतो का; या प्रश्नाचे उत्तर आता