शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावला लालबागचा राजा


मुंबई : महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी नवरात्रौत्सवाचा उत्साह आहे, त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग तसेच मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे वाताहात झाली आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सरसावले आहे. लालबागच्या राजा मंडळाने अतिवृष्टीबाधित नागरिकांसाठी पन्नास लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान मोजता येणं शक्य नाही. पण प्रत्येकाकडून फूल नाही तर फुलाची पाकळी मदत व्हावी, अशी भावना व्यक्त करत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठीचा धनादेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याने सुपूर्द केला. हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा होणार आहे. या निधीतून पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे.


महायुतीच्या सर्व आमदार आणि खासदारांनी त्यांचा एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीतून राज्यातील पुराचा फटका बसलेल्यांना मदत केली जाणार आहे. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानेदेखील सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पावसाचा आणि पुराचा फटका बसलेल्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील अनेक सामाजिक संघटनांनी तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही पावसाचा आणि पुराचा फटका बसलेल्यांना मदत करण्यासाठी आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.


कालपर्यंत ज्या नद्यांचे पाणी शेती फुलवत होते त्याच नद्या पुरामुळे फुगल्या आहेत. शेतीचे अतोनात नुकसान करत आहे. ठिकठिकाणी जमीन खरडून निघाली आहे. उभी पिकं पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेली आहेत. काही उरलंच असेल तर सडून गेल्यामुळे न वापरण्याच्या स्थितीत पोहोचले आहे. हजारो नागरिकांना नेसत्या वस्त्रांनिशी राहते घर सोडून सरकारी शिबिरात आश्रय घ्यावा लागला आहे. या संकटातून सावरण्यासाठी सरकार, प्रशासन मदतकरत आहे. अनेक सामाजिक संस्था, संघटना, स्वयंसेवक मदतीसाठी पुढे येत आहेत. अनेकांनी वैयक्तिकरित्या पण मदत केली आहे. या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मदत जाहीर केली आहे.


Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र