Dashavtar Movie : प्रत्येक थिएटर हाउसफुल्ल; सर्वत्र ‘दशावतार’चीच चर्चा

मुंबई : झी स्टुडियोजची प्रस्तुती असलेल्या आणि सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित 'दशावतार’ला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच आठवड्यात हाऊसफुल्ल शोजने धमाकेदार सुरुवात केलेल्या या चित्रपटाचा उत्साह तिसऱ्या आठवड्यातही अजिबात कमी झालेला नाही. उलट दिवसेंदिवस वाढतच आहे. बॉक्स ऑफिसवर भरभरून कमाई करत असलेला हा चित्रपट केवळ कथानकामुळेच नाही, तर प्रभावी मांडणी, दमदार अभिनय आणि आपल्या संस्कृतीशी जोडणाऱ्या आशयामुळेही रसिकांचे मन जिंकतोय.


मुंबईत मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाही याबद्दल कायम एक नाराजीचा सूर असतो . अनेकदा मराठी चित्रपटाला प्राईम लोकेशन्सवर संधीही मिळत नाही, मिळाली तरी फार काळ टिकत नाही असंही चित्र अनेकदा बघायला मिळतं. मात्र ‘दशावतार’ने या सगळ्या अडथळ्यांना पार करत मराठा मंदिर, रॉक्सी, स्टर्लिंग, इरॉस, रिगल, आयनॉक्स, पॅलेडियम पीव्हीआर, कस्तुरबा, मिलाप अशा थिएटर्समध्ये सलग तीन आठवडे हाऊसफुल्ल शोज दिले आहेत. विशेष म्हणजे या थिएटर्समध्ये साधारणपणे हिंदी, इंग्रजी वा गुजराती चित्रपटांचीच भर असते. अशा ठिकाणी मराठी चित्रपटाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठी सोबतच अमराठी प्रेक्षकांची गर्दी खेचली आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.


याहून अधिक आनंदाची गोष्ट म्हणजे कोकणातील यश. साधारणपणे कोकणात चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. अगदी बॉलिवूडचे मोठे चित्रपटही तिथे थिएटर्स हाऊसफुल्ल करत नाहीत. परंतु ‘दशावतार’ने हे समीकरण पूर्णपणे बदलून टाकले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, पेण, कणकवली, महाड, चिपळूण या सर्व भागातील प्रत्येक थिएटरमध्ये हा चित्रपट लागला आहे आणि प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली आहे. पर्यावरण, निसर्ग, कोकणी माणूस आणि दशावतार कलेवर आधारलेले कथानक स्थानिक प्रेक्षकांना इतके भिडले आहे की, 'खूप काळाने आपल्या मातीची, आपल्या कलेची गोष्ट सांगणारा चित्रपट पाहायला मिळतोय', अशी भावना तेथील प्रेक्षक व्यक्त करत आहेत.


या चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसवर माया कमावली नाही तर जनमानसात एक चळवळ उभी करण्याचं कामही केलं आहे. कोकणातील जमिनी, देवराया, निसर्ग वाचवण्यासाठी कोकणी माणूस पुढाकार घेताना आज दिसत आहे. कोकणातील कातळशिल्पांबाबत, त्याच्या संवर्धनासाठी तो सजग झाला आहे. ज्या दशावतारी कलाप्रकाराचा आधार या चित्रपटात घेतला गेला, ती लोककला आणि दशावतारी कलाकार यांना पुन्हा तेजी मिळवून देण्यासाठी हा चित्रपट कारणीभूत ठरतो आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आलेली मरगळ झटकून मराठी चित्रपटाची ताकद दाखवून देण्यात दशावतार हा चित्रपट आज अग्रणी ठरला आहे.


झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांचे असून त्यांच्यासह सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी चित्रपटाचे निर्माते आहेत. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते असून यात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.


Comments
Add Comment

PATRAPATRI : ‘पत्रापत्री’ शब्दांची जादू आणि मैत्रीच्या आठवणींचा शंभर प्रयोगांचा यशस्वी प्रवास!

Vijay Kenkre and Dilip Prabhavalkar : सांस्कृतिक विश्वात गेल्या दोन वर्षांत ज्या एका प्रयोगाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, तो

CINTAA : रणवीर सिंग-फरहान अख्तर वादावर CINTAA अध्यक्ष पूनम ढिल्लों यांची स्पष्टोक्ती; 'कलाकारांना कामगार म्हणून अधिकृत मान्यता मिळवणे हेच आमचे ध्येय'

NAVI MUMBAI : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील अलीकडील वादाच्या पार्श्वभूमीवर CINTAA च्या अध्यक्षा

Bharat Bhagy Vidhata Movie:  ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटावर नर्सेस संघटनेचा आक्षेप; प्रदर्शनापूर्वीच निर्माण झाला वाद

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) आगामी ‘भारत भाग्य विधाता’ (Bharat Bhagy Vidhata) हा चित्रपट सध्या चर्चेत असून

'Deool Band 2' Box Office Collection : मराठी सिनेमाचा नवा विक्रम? 'देऊळ बंद २'ची १०० कोटींच्या दिशेने दमदार वाटचाल!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित आणि अभिनित 'देऊळ बंद २' (Deool Band 2) चित्रपटाची जोरदार

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

रंगात आलेला प्रयोग राजवाडेंनी थांबवला; कारण...

नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे.