Wednesday, September 24, 2025

टायफून रागासा वादळामुळे तैवानमध्ये १४ जणांचा मृत्यू

टायफून रागासा वादळामुळे तैवानमध्ये १४ जणांचा मृत्यू

चीनचे 20 लाख लोक स्थलांतरित

हाँगकाँग : वर्षातील सर्वात शक्तिशाली वादळ, सुपर टायफून रागासा, मंगळवारी(दि. २३) हाँगकाँगमध्ये धडकले. ज्यामध्ये २०० किमी/ताशी वेगाने वारे आणि मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे पूर आला. रागासाचा परिणाम तैवान आणि चीनपर्यंत जाणवत आहे. तैवानमध्ये टायफून रागासामुळे भीषण हानी झाली असून किमान १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि अनेक जण जखमी झाले आहेत, तर आणखी १२९ लोक बेपत्ता आहेत. दरम्यान, चीनने किनारी भागातून २० लाख लोकांना बाहेर काढले आहे. येथे १०० लोक बेपत्ता आहेत. हाँगकाँग सरकारने आज, बुधवारी टायफूनचा इशारा सिग्नल १० (सर्वात शक्तिशाली टायफून) जारी केला. तर हवामान खात्याने इशारा दिला की, पुढील काही तासांत हे वादळ दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये पोहोचू शकते. हुआलिएनमध्ये सुमारे ७० सेमी (२८ इंच) पावसाची नोंद झाली आहे.हाँगकाँगमध्ये अनेक नागरिक २-३ मीटर उंच लाटा पाहण्यासाठी किनाऱ्यावर जमले. अधिकाऱ्यांनी येथे एका मुलासह तीन लोकांना समुद्रातून वाचवलं आहे. रागासा टायफून आता दक्षिण चीन व हाँगकाँगकडे सरकत आहे. चीनच्या राष्ट्रीय हवामान विभागाने इशारा दिला आहे की, बुधवारी(दि.२४) संध्याकाळी दरम्यान, रागासा वादळ ग्वांगडोंगच्या ताइशान आणि झानजियांग शहरांच्या दरम्यान पोहोचू शकतं. ग्वांगडोंग आणि फुजियान प्रांतात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे ग्वांगझू आणि शेन्झेन सारख्या प्रमुख शहरांमध्ये शाळा, वाहतूक आणि हवाई सेवा बंद करण्यात आल्या.चीनने यावर्षी पहिल्यांदाच उंच समुद्राच्या लाटांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये २.८ मीटर (९ फूट) पर्यंतच्या वादळी लाटांचा अंदाज आहे. हाँगकाँग विमानतळावरही वादळाचा परिणाम झाला. सुरक्षेच्या कारणास्तव शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यामुळे हजारो प्रवासी अडकून पडले. शहरातील मेट्रो आणि बस सेवा देखील विस्कळीत झाल्या. अनेक भागात पाणी साचल्याने दुकाने आणि घरांचे नुकसान झाले, त्यामुळे अधिकाऱ्यांनी रहिवाशांना घरातच राहण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला. तैवानमध्ये परिस्थिती आणखी गंभीर आहे, जिथे मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि पूर आला आहे. बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. खराब हवामानामुळे लष्कर आणि बचाव पथकांना अडचणी येत आहेत. अनेक भागात वीज आणि दळणवळण सेवा खंडित झाल्या आहेत, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठी गैरसोय होत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा