
दुबई: आशिया कप २०२५मधील सुपर ४च्या सामन्यात भारताने बांगलादेशला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशसमोर विजयासाठी १६९ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताच्या माऱ्यासमोर बांगलादेशचे शेर ढेर झाले आणि त्यांचा ४१ धावांनी पराभव झाला. बांगलादेशचा संपूर्ण संघ १२९ धावांत गारद झाला.
भारताने विजयासाठी दिलेल्या १६९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशची सुरूवात खराब झाली. ४ धावांवर त्यांचा पहिला बळी गेला. सलामीवीर सैफ हसन याने एकट्याने ६९ धावांची सर्वाधिक खेळी केली. तर परवेझने २१ धावा केल्या. बांगलादेशचे इतर सर्व फलंदाज दुहेरी धावाही करू शकले नाहीत. कुलदीप यादवने ३ बळी घेतले तर जसप्रीत बुमराह आणि वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने संथ सुरूवात केली. पहिल्या षटकांत गिल-अभिषेकने केवळ ३ धावा केल्या. यानंतर बांग्लादेश गोलंदाजांसमोर अभिषेक-गिल सावध फलंदाजी करताना दिसले. मात्र चौथ्या षटकापासून गिलने चौकार-षटकारांचा पाऊस करण्यास सुरूवात केली. अभिषेकही लयीत दिसला. ५व्या षटकांत भारताची धावसंख्या ५५-० अशी होती. मात्र ७व्या षटकांत गिलच्या रूपात भारताला पहिला झटका बसला. त्याने २९ धावा केल्या. त्यानंतर आलेला शिवम दुबेही पटकन बाद झाला. त्याला केवळ २ धावा करता आल्या. त्यानंतर अभिषेक शर्माने आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर भारताने आपले शतकही पूर्ण केले. १२व्या षटकांत भारताला तिसरा झटका बसला. अभिषेक शर्मा ३७ बॉलमध्ये ७५ धावा करून बाद झाला. याच षटकांत सूर्यकुमार यादवनेही आपली विकेट गमावली. त्यानंतर तिलक वर्माही स्वस्तात बाद झाला. त्याने केवळ ५ धावा केल्या. मात्र हार्दिक आणि अक्षर यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोघांनी भारताची धावसंख्या १६८ पर्यंत पोहोचवली.
आकडेवारीनुसार, हा सामना एकतर्फी होण्याची अपेक्षा आहे. कारण बांगलादेशने दोन्ही संघांमधील १७ टी-२० सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. शेख हसीना सरकारच्या पतनानंतर भारताचे बांगलादेशशी राजनैतिक संबंध देखील ताणले गेले आहेत. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार सत्तेत राहिल्यास, बीसीसीआयने या वर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेशमध्ये होणारी मालिका २०२६ पर्यंत पुढे ढकलली होती. कागदावर भातीयय संघ अधिक मजबूत आहे. पण बांग्लादेशला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. सूर्यकुमार यादवचा संघ आणखी एका विजयासाठी प्रबळ दावेदार आहे. पण टी-२० क्रिकेटमध्ये काहीही भाकित करता येत नाही आणि बांगलादेशचे फिरकीपटू दमदार कामगिरीने भारताला धक्का देण्यास सज्ज आहेत.
भारताचे प्लेइंग इलेवनः अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सैमसन (विकेट कीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंह.
बांगलादेश (प्लेइंग इलेवन): सैफ हसन, तंजीद हसन तमीम, परवेज हुसैन इमोन, तौहीद हृदोय, शमीम हुसैन, जेकर अली (विकेटकीपर/कर्णधार), मोहम्मद सैफुद्दीन, रिशाद हुसैन, तंजीम हसन साकिब, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान