IND vs PAK: भारताने धुलाई केल्यानंतर पुन्हा ICCकडे गेला पाकिस्तान, आता ही केली तक्रार

दुबई: आशिया कप २०२५ च्या सुपर फोरमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सलामीवीर फखर झमानच्या वादग्रस्त बाद निर्णयाबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) अधिकृत तक्रार दाखल केली आहे.


सामन्याच्या तिसऱ्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर फखर झमानने फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या कडेला लागून यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या हातात गेला. सॅमसनने पुढे झुकून हा झेल घेतला. ऑन-फिल्ड अंपायरने हा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे सोपवला, कारण चेंडू जमिनीला लागून सॅमसनच्या हातात गेला की नाही, याबाबत संशय होता. अनेक रिप्ले आणि विविध कोनातून तपासणी केल्यानंतर तिसऱ्या अंपायरने फखरला बाद घोषित केले.


या निर्णयामुळे फखर झमान आणि पाकिस्तानचे संघ व्यवस्थापन दोघेही नाराज झाले. त्यांना असे वाटले की, चेंडू जमिनीला लागल्यानंतर सॅमसनच्या हातात गेला होता, त्यामुळे तो 'नाबाद' असायला हवा होता. पाकिस्तानच्या कर्णधार सलमान अली आगाने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.


मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला पत्र लिहून तिसऱ्या अंपायरच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. पीसीबीच्या मते, तिसऱ्या अंपायरने उपलब्ध असलेल्या सर्व कोनांमधून तपासणी न करता घाईत निर्णय दिला. त्यांचा दावा आहे की, हा निर्णय चुकीचा होता आणि यामुळे सामन्यावर परिणाम झाला. पीसीबीने यापूर्वीही आशिया कपमधील 'हँडशेक' न केल्याच्या मुद्द्यावरून आयसीसीकडे तक्रार केली होती.


Comments
Add Comment

Fruad In Cricket : क्रिकेटविश्वातला महाघोटाळा, एकाच पत्त्यावर आढळले १२ खेळाडू

पुद्दुचेरी : भारतीय क्रिकेटचा जागतिक पातळीवर दबदबा आहेच. बीसीसीआयची आर्थिक ताकद, आयपीएलसारख्या जगातील सर्वात

भारत विरुद्ध द. आफ्रिका टी-२० चा रणसंग्राम!

‘कटक’मध्ये पहिला सामना; ‘अहमदाबाद’मध्ये अंतिम लढत मुंबई : के. एल राहुलच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिकेत

Smruti Mandhana | अखेर स्मृतीने मौन सोडले, पलाशसोबत लग्न न करण्याचा निर्णय!

मुंबई: मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. स्मृतीने

टीम इंडिया 'यशस्वी', रो'Hit' चा विक्रम, विशाखापट्टणममध्ये भारताने साजरा केला मालिका विजय

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने

भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला, जिंकण्यासाठी हव्या २७१ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी