मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आला उच्च न्यायालयाचा निर्णय


मुंबई : मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. यामुळे हैदराबाद गॅझेटियरच्या मदतीने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या शासनमान्य प्रक्रियेतील अडथळे दूर झाले आहेत.


फडणवीस सरकारने सप्टेंबर महिन्यात हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी आणि इतर पूरक कागदपत्रांची छाननी करुन अर्ज करणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत एक शासननिर्णय काढल्याचे सांगितले. याच सरकारी निर्णयाची प्रत काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांना देण्यात आली. जरांगेंनी प्रसारमाध्यमांसमोर दाखवलेल्या शासननिर्णयाला अनेक ओबीसी संघटनांनी आव्हान दिले होते. या याचिकांवर आज सुनावणी घेण्यात येण्याची शक्यता होती. मात्र न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने तांत्रिक कारणावरून या याचिकांवर सुनावणी करण्यास आज नकार दिला आहे. त्यामुळे आता या याचिका मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणीला जाण्याची शक्यता आहे. जोपर्यंत पुढील निर्णय येत नाही तोपर्यंत मराठा आरक्षण सुरक्षित आहे. जीआरनुसार कागदपत्रे तपासून आणि हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी बघून योग्य व्यक्तींना कुणबी प्रमाणाक्ष दिले जाईल.


कुणबी प्रमाणपत्रांद्वारे मराठ्यांचे ओबीसीकरण सुरू असल्याचा आरोप ओबीसींमधून मराठ्यांवर होत आहे. हा प्रकार ओबीसींवर अन्याय करणारा असल्याची भूमिका अनेक ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने काढलेल्या जीआरला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पण तांत्रिक कारणांमुळे मुंबई उच्च न्यायालयने सोमवारी सुनावणी घेण्यास नकार दिला. यामुळे सध्या शासनाचा जीआर सुरक्षित आहे.


Comments
Add Comment

फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आता पोस्ट ऑफिसमध्येही रेल्वे तिकीट मिळणार

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा यासारख्या सणांमध्ये रेल्वे तिकिटे मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी

मुंबई  : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २४०० कोटी रुपयांच्या मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी दिली

मुंबईत जलवाहतुकीत नवी क्रांती! ना लाटांचे धक्के, ना आवाज मुंबईत येतेय भविष्याची ‘कॅन्डेला’ बोट

कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानाने युक्त बोटी लवकरच मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात दाखल होणार आहेत.

दिवाळीच्या तोंडावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, नागरिकांचा प्रवास होणार उशिराने

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार, १९ ऑक्टोबर रोजी