IND vs PAK: आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये रंगणार महामुकाबला

अबूधाबी : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने साखळी सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची चव चाखायला लावली होती. आणि आता सुपर फोर टप्प्यातही ही कामगिरी कायम ठेवण्याचा प्रयत्न भारतीय संघ करणार आहे. मागील सामन्यातील हस्तांदोलन वादानंतर दोन्ही संघांमधील तणाव वाढणार असल्याने भारत आणि पाकिस्तानमधील हा सामना आणखी मनोरंजक ठरणार आहे.


भारताने साकळी सामन्यात दमदार कामगिरी केली होती. भारताने तिन्ही सामने जिंकले आणि गट अ मध्ये अव्वल स्थान पटकावले. भारताने ओमानविरुद्धच्या अंतिम संघात दोन बदल केले होते. जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांना विश्रांती दिली होती. आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांना संधी देण्यात आली होती. भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा आणि ओमानविरुद्धच्या त्यांच्या फलंदाजीच्या आक्रमणाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्यात ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याच्या फलंदाजीच्या क्रमाचा प्रयोग केला. तर संजू सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले होते. सॅमसनने या संधीचा फायदा घेतला आणि अर्धशतक झळकावले होते.


भारताने पहिले दोन सामने सहज जिंकले असले तरी, ओमानविरुद्ध जिंकण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. पाकिस्तानविरुद्ध भारताची पूर्वीची रणनीती अवलंबणे अपेक्षित आहे. खरं तर, पहिल्या दोन सामन्यांमध्ये संघ तीन फिरकीपटू आणि बुमराहच्या रूपात एका वेगवान गोलंदाजासह खेळला होता. ही रणनीती यशस्वी ठरली. भारताने ओमानविरुद्ध अर्शदीप आणि हर्षितला संघात स्थान दिले होते. पण कोणताही गोलंदाज फारसा प्रभावी ठरला नाही. पण अर्शदीपने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० विकेट्स पूर्ण केल्या. आणि असे करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. दुसरीकडे हर्षितलाही यश मिळाले. पण दुबईची खेळपट्टी संथ आहे आणि फिरकीपटूंना अनुकूल आहे. भारत अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती या फिरकी त्रिकुटावर अवलंबून असेल. अक्षर ओमानविरुद्ध दुखापतग्रस्त झाला होता, ज्यामुळे भारतासाठी चिंता वाढली होती. पण क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी स्पष्ट केले की, अक्षर चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याच्या सहभागाची शक्यता वाढली आहे.

Comments
Add Comment

INDvsAUS T20 : नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय, प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज बाद

होबार्ट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा टी २० सामना होबार्ट येथील बेलेरिव्ह ओव्हल स्टेडियममध्ये सुरू आहे.

ऐतिहासिक महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका

नवी मुंबई : महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना (फायनल मॅच) नवी मुंबईच्या डी. वाय पाटील

श्रेयस अय्यरला सिडनीतील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; फिट झाल्यानंतर भारतात परतणार

सिडनी : भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर गेल्या काही दिवसांपासून सिडनीमधील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट

टेनिसपटू रोहन बोपण्णाची टेनिसमधून निवृत्ती

मुंबई : भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा याने निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी तो पहिल्यांदाच

ICC Women's World Cup 2025 : महिला वर्ल्ड कप २०२५ च्या विजेत्या-उपविजेत्या संघाला किती रक्कम मिळणार? पराभूत संघावरही होणार 'कोट्यवधींचा वर्षाव'! आकडेवारी पहाच...

नवी मुंबई : महिला विश्वचषक २०२५ (ICC Women's World Cup 2025) चा अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन

क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिलांसाठी सात वेगवेगळे नियम

मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट संघ (Indian cricket team) सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. तर