सौदी अरेबियासोबतच्या नवीन करारानंतर पाकड्या हवेत! भारताविरुद्ध ओकळी गरळ

भारतासोबत युद्धासारखी परिस्थिती उद्भवली तर सौदी अरेबिया पाकिस्तानचे रक्षण करेल, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान


इस्लामाबाद : पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये नुकताच संरक्षण करार झाला आहे, ज्याच्या जिवावर पाकिस्तानचे मंत्री पुन्हा एकदा माकड उड्या मारू लागले आहेत. त्याचे एक पहिले उदाहरण म्हणजे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक भारताविरुद्ध एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकारांना सांगितले की, जर भारताने पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले तर सौदी अरेबिया पाकिस्तानचे रक्षण करेल. ते म्हणाले की, पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधील अलीकडील करारात सामरिक परस्पर मदतीची तरतूद समाविष्ट आहे.


ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानी चॅनेल जिओ टीव्हीशी बोलताना या कराराची तुलना नाटोच्या कलम ५ शी केली, ज्यामध्ये 'सामूहिक संरक्षण' हे तत्व लागू होते. याचा अर्थ असा की जर कोणत्याही सदस्य देशावर हल्ला झाला तर तो सर्व सदस्य देशांवर हल्ला मानला जातो. सौदी अरेबियासोबतचा हा करार आक्रमक नसून बचावात्मक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


नाटोचे उदाहरण देत ते म्हणाले की जर कोणावरही, मग तो पाकिस्तान असो वा सौदी अरेबिया, हल्ला झाला तर दोन्ही देश एकत्रितपणे त्याचा सामना करतील. वृत्तानुसार, ख्वाजा आसिफ यांनी स्पष्ट केले की हा करार कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यासाठी वापरण्याचा हेतू नाही. जर पाकिस्तान किंवा सौदी अरेबियाला कोणताही धोका निर्माण झाला तर ही व्यवस्था आपोआप लागू होईल.



पाकिस्तानची अण्वस्त्रे सौदी अरेबियाच्या वापरासाठी उपलब्ध


पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, पाकिस्तानची अण्वस्त्रे सौदी अरेबियाच्या वापरासाठी उपलब्ध राहतील. त्यांनी स्पष्ट केले की, या नवीन कराराअंतर्गत पाकिस्तान सौदी अरेबियासोबत आपल्या क्षमता सामायिक करण्यास तयार आहे. आसिफ यांनी असेही म्हटले की, पाकिस्तानने नेहमीच आपल्या अण्वस्त्र सुविधांवर देखरेख ठेवण्याची परवानगी दिली आहे आणि कधीही कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही.


या आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या रियाध दौऱ्यादरम्यान पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी झाली आहे. ज्याचा थेट परिणाम भारतावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



पाकिस्तान आणि सौदी अरेबिया कराराबद्दल भारतीय तज्ञांचे मत


या कराराबद्दल भारत सरकारने असे म्हटले की हा करार दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संरक्षण व्यवस्थेला औपचारिकता प्रदान करतो. तसेच त्याचे परिणाम विश्लेषण सध्या केले जात आहेत. दरम्यान, लष्करी आणि राजकीय तज्ञांनीदेखील या कराराबद्दल आपले मत व्यक्त केले आहेत. त्यांनी नमूद केले की हा करार सौदी अरेबियाच्या आर्थिक संसाधनांना पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाशी जोडतो आणि दोन्ही देशांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पण या करारामुळे भारताच्या संरक्षण प्राणलीवर कोणत्याही प्रकारचा धोका उत्पन्न होईल असे वाटत नाही.

Comments
Add Comment

भारतच नव्हे, लंडनच्या ट्रेनमध्येही विकले जातात समोसे..

लंडन : सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील ट्रेनमधील एक फोटो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक भारतीय व्यक्ती

Middle East Crisis Gen Z Protest : नव्या वर्षाच्या पहाटेच इराणमध्ये 'जनक्रांती'चा भडका! Gen Z रस्त्यावर, महागाई आणि बेरोजगारीने संतापाचा कडेलोट; खोमेनी सरकार हादरले!

तेहरान : जगभरात तरुणाईने सत्तापालट घडवण्याचे सत्र सुरू असतानाच आता मध्य-पूर्वेतील इराणमध्येही क्रांतीची ठिणगी

नववर्षाच्या पार्टीदरम्यान बारमधील भीषण स्फोटात ४० ठार, १०० जखमी

स्वित्झर्लंडच्या आलिशान ‘स्की रिसॉर्ट’मध्ये दुर्घटना स्वित्झर्लंड: स्वित्झर्लंडमधील क्रॅन्स-मोंटाना या

क्रुरपणे मारहाण अन् नंतर पेट्रोलने जाळण्याचा प्रयत्न! बांगलादेशात आणखी एका हिंदूवर हल्ला

ढाका: मागील काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी दोन हिंदू तरुणांची जमावाने

New Year Celebrations : 'नवे वर्ष' ठरले काळरात्र! स्वित्झर्लंडच्या पबमध्ये भीषण स्फोट अन् आग; तब्बल 'इतक्या' जणांचा मृत्यू...थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर

क्रान्स-माँटाना : जगभरात २०२६ च्या स्वागताचा जल्लोष सुरू असतानाच स्वित्झर्लंडमधून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी

किरिबाटी , न्यूझीलंडसह अनेक देशांत नववर्षाच जोरदार स्वागत

हैदराबाद : सगळीकडे नवीन वर्षाच स्वागत हे जोरदार करण्यात आले.त्यामध्ये किरिबाटी या देशात भारतीय प्रमाणवेळेनुसार