Thursday, September 18, 2025

नीरज चोप्राने पाकिस्तानच्या अर्शद नदीमला मैदानात दिला नाही भाव

नीरज चोप्राने पाकिस्तानच्या अर्शद नदीमला मैदानात दिला नाही भाव

मुंबई: जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५मध्ये आज भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये सगळ्यांच्या नजरा नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांच्यावर होत्या. नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांच्यामुळे हा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा बनला होता.

दरम्यान, या स्पर्धेत दोन्ही खेळाडूंनी निराश केले. नीरज चोप्राला ८व्या स्थानावर समाधान मानावे लागले तर नदीम १०व्या स्थानावर राहिला.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाडले आहेत. आशिया कप स्पर्धेतही विजयानंतर भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते. यामुळे पाकिस्तानचा संघ चांगलाच खवळला होता. पाकिस्तानच्या संघाने यूएईविरुद्धच्या सामन्याआधीही खूप नाटकं केली होती. अखेरीस त्यांची नाटकं काही चालली नाहीत आणि त्यांना यूएईविरुद्ध सामना खेळावा लागला.

नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम जेव्हा फायनलमध्ये उतरले तेव्हा दोन्ही देशांच्या चाहत्यांच्या नजरा त्यांच्यावर होत्या. या सामन्यात नीरज चोप्राने एका पद्धतीने नदीमला कोणताच भाव दिला नाही. दोघांमध्ये जुनी मैत्रीही पाहायला मिळाली नाही.

फायनलच्या दरम्यान पावसामुळे खेळावर थोडा परिणाम झाला. जेव्हा पाऊस सुरू होता तेव्हा दोघेही जवळ होते मात्र त्यांच्यात कोणतीही बातचीत झाली नाही.

Comments
Add Comment