पाकिस्तानच्या 'खोट्या' फुटबॉल संघाचा जपानमध्ये पर्दाफाश

इस्लामाबाद: एका फुटबॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी जपानमध्ये गेलेल्या पाकिस्तानच्या 'बनावट' फुटबॉल संघाला जपानी अधिकाऱ्यांनी विमानतळावरच ताब्यात घेतले. कागदपत्रांच्या तपासणीनंतर हा संघ मानवी तस्करीचा भाग असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची मोठी बदनामी झाली आहे.



काय आहे प्रकरण?


पाकिस्तानच्या सियालकोटमधून २२ जणांचा एक गट जपानला गेला होता. या गटाने आपण पाकिस्तानी फुटबॉल संघाचे खेळाडू असल्याचे भासवले होते. त्यांच्याकडे पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनशी संबंधित कागदपत्रे आणि परराष्ट्र मंत्रालयाची बनावट 'ना हरकत प्रमाणपत्रे' (NOC) देखील होती. परंतु, जपानमधील विमानतळ अधिकाऱ्यांना त्यांच्यावर संशय आला आणि त्यांनी त्यांची सखोल चौकशी केली. या चौकशीत ते खरे खेळाडू नसून मानवी तस्करीचा बळी ठरलेले नागरिक असल्याचे उघड झाले.


या घटनेनंतर पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (FIA) तपास सुरू केला. तपासात मलिक वकास नावाच्या एका व्यक्तीला या मानवी तस्करीचा मुख्य सूत्रधार म्हणून अटक करण्यात आली आहे. त्याने 'गोल्डन फुटबॉल ट्रायल' नावाचा एक बनावट फुटबॉल क्लब सुरू केला होता. जपानला जाण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून त्याने ४० ते ४५ लाख रुपये घेतले होते.


जपानी अधिकाऱ्यांनी या बनावट संघाला तातडीने मायदेशी परत पाठवले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पाकिस्तानच्या तपास यंत्रणांनी अधिक तपास सुरू केला आहे. हा प्रकार केवळ एकट्या या संघापुरता मर्यादित नसून, याआधीही अशा प्रकारे अनेकांना विदेशात पाठवण्यात आले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पुन्हा एकदा मानहानी झाली आहे.

Comments
Add Comment

Ranji Trophy: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी बिहार रणजी संघाचा उपकर्णधार

साकिबुल गनीकडे नेतृत्वाची धुरा मुंबई : १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामासाठी बिहार

कुलदीप यादवने दिल्लीमध्ये केले नको ते शतक, बनवला हा खराब रेकॉर्ड

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा चायनामन फिरकी

भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी हव्या ५८ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

भारताला जिंकण्यासाठी हव्या १२१ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

IND vs WI:चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, भारताला विकेटची प्रतीक्षा

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला

वर्ल्डकपमध्ये दोन पराभव, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल का? जाणून घ्या समीकरण

मुंबई: महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभवास सामोरे जावे लागले. या