मुंबईत मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईत मागील काही दिवसांपासून साथीच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ होत असून मलेरियाच्या आजाराच्मा रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात ५१८२ मलेरियाचे रुग्ण आढळून आले होते, तर मंदा जानेवारी ते १५ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीतच ६२७७ मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्येही वाढ झालेली आहे. त्यामुळे मुंबईतील या वाढत्या रुग्णांमुळे मुंबई तापल्याचे दिसून येत आहे.


मुंबई महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागाने पावसाळा जन्प आजारांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्या आकडेवारीनुसार मलेरिया आणि चिकुनगुनिया आणि हिपॅटायटीस ए आणि ई या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार १ ते १५ सप्टेंबर या कालावधीमध्ये ४ लाख ७४ हजार ४५० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून २२ लाख ७३ हजार ५२१ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ८३ हजार २२८ लोकांचे रक्त नमुने घेण्यात आले आहे. ४४ हजार ६२५ नागरिकांची लेप्टोस्पायरोसीस प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आले आहे, तर मलेरिया नियंत्रणानुसार २५ हजार ३६३ डासांच्या दृष्टिकोनातून तपासणी करण्यात आली आणि त्यात १६७८ डासांचे अड्डे आढळून आले असल्याची महिती कीटकनाशक विभागाने दिली आहे.


महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधी दरम्यान मलेरिया आणि चिकुनगुनिया या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत असले तरी तरी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान या आजारांच्या रुग्णसंख्येत घट नोंदवली गेली आहे. हा कल २०२४मधील स्थितीशी सुसंगत आहे. जलजन्य आजारांमध्ये कोणतीही वाढ आढळून आलेली नाही असेही प्रशासनाने स्पष्ट केले.



काय घ्याल काळजी


मलेरिया, डेग्यू, चिकुनगुनिया प्रतिबंधासाठी आपल्या घरामध्ये घराच्या अजुबाजूला व इमारतीच्या परिसरात कुठेही
पाणी साचलेले असणार नाही याची काळजी घ्यावी, ताप आल्यास जवळच्या महापालिका दवाखान्यात त्वरीत संपर्क साधावा,


लेप्टोस्पायरोसीस प्रतिबंधासाठी मुसळधार पावसात उघड्या पायाने चालणे टाळा, साचलेल्या पावसाच्या संपर्कात आल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार रोगप्रतिबंधक उपचार घ्यावे


गॅस्ट्रो हिपॅटायटीस, टायफॉईड आजाराच्या प्रतिबंधासाठी रस्त्यावरील उघडे अन्न टाळा, जेवणापूर्वी हात धुवा किया हँड सॅनिटायझर वापरा तसेच पाणी उकळून प्याये


Comments
Add Comment

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी

रेडिओ क्लब जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार - मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे

जलक्षेत्रांतील जमिनींच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणणार विशेष धोरण - मंत्री नितेश राणे यांनी घेतला ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी’चा आढावा

मुंबई : राज्यातील जलक्षेत्रांलगतच्या जमिनींचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्यासाठी

नाहूर–ऐरोली उड्डाणपूल ठरणार गेमचेंजर, केबल-स्टेड रचनेतून ठाणे–मुंबईला नवी गती; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प निर्णायक टप्प्यावर