सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंना कोर्टात आली भोवळ, उपचारादरम्यान मृत्यू

नवी दिल्ली: दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं सोमवारी रात्री निधन झालं. वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सर्वोच्च न्यायालयात चक्कर आल्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असल्याचे म्हंटले जात आहे. त्यांच्या निधनानंतर कायदा क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात देखील शोककळा पसरली आहे.

सिद्धार्थ शिंदे यांना सोमवारी न्यायालयात अचानक भोवळ आली. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रूग्णालयात नेले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. सिद्धार्थ  मूळचे नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरचे ते रहिवासी होते. तसेच हे माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते. सिद्धार्थ शिंदे यांची राज्यात वेगळीच ओळख होती. त्यामुळे यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धार्थ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम करत होते. महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीतीच उत्तम समज, संविधानाचे सखोल ज्ञान असलेला विधीज्ञ अशी त्यांची ओळख होती. ते  फक्त वकील नसून, कायद्याचे विश्लेषणसुद्धा सोप्या भाषेत सामान्यांना समाजावून सांगायचे.

मराठा आरक्षण असो किंवा राज्यातील सत्तासंघर्ष, यांसारख्या महत्वाच्या सुनावण्यांवेळी त्यांनी सुप्रिम कोर्टातील युक्तिवाद आणि अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या अकाली निधनानंतर कायद्याच्या क्षेत्रात अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
Comments
Add Comment

Devendra Fadnavis at Davos : महाराष्ट्राची दावोसमध्ये ऐतिहासिक भरारी; 'थर्ड मुंबई' प्रकल्पासाठी ११ जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड

भारत - यूएई करारांवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचा भारताचा अल्पकालीन

शबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ईडी’कारवाई

तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी नवी दिल्ली : केरळमधील पवित्र सबरीमाला अय्यप्पा मंदिराशी संबंधित सोने चोरी

‘राष्ट्रगीता’वरून तामिळनाडूत हाय व्होल्टेज ड्रामा

राज्यपालांचा सभागृहातून सभात्याग नवी दिल्ली : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन

युएईच्या अध्यक्षांच्या तीन तासांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या दिल्ली दौऱ्याने भारत-यूएई संबंधांना

नदी पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्राचे मोठे पाऊल

देशातील पहिल्या राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी केले सादरीकरण नवी दिल्ली :