राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारण देत बिरेंद्र सराफ यांनी महाधिवक्तापदाचा राजीनामा दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सहकाऱ्यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी माहिती देईपर्यंत अनेकांना राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिल्याची माहिती नव्हते. बिरेंद्र सराफ यांच्याकडे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये बाजू मांडण्याची आणि महाराष्ट्र सरकारला कायदेशीर सल्ला देण्याची मुख्य जबाबदारी होती.

पुढील व्यवस्था करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत बिरेंद्र सराफ यांनी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत महाअधिवक्ता पदाची जबाबदारी हाताळण्याची तयारी दाखवली आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयात सराफ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. बिरेंद्र सराफ यांनी त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठी आणि वादग्रस्त प्रकरणं यशस्वीपणे हाताळली आहेत. लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या घरावर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणात सराफ यांनी कंगनाची बाजू उच्च न्यायालयात मांडली होती. यानंतर उच्च न्यायालयाने कंगनाच्या बाजूनं निकाल देत महापालिकेला कंगनाला दोन कोटी रूपयांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले होते.

डॉ. बीरेंद्र सराफ हे देशातील एक प्रमुख कायदेशीर सल्लागार आहेत. मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील म्हणून त्यांनी काम केले आहे. ते २०२२ पासून राज्याचे महाधिवक्ता आहेत. त्यांची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात झाली होती. तेव्हापासून ते राज्याचे महाधिवक्ता आहेत.
Comments
Add Comment

विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक; मंगल नांगरे पाटील यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री

मुलांच्या तिकीट बुकिंगच्या नियमात बदल ५-१२ वर्षे वयादरम्यान तिकिटाचे धोरण ठरणार

मुंबई : भारतीय रेल्वेच्या २०२५ च्या बाल तिकीट धोरणानुसार ५ वर्षांखालील मुले स्वतंत्र बर्थ किंवा सीट न घेता

उबाठा युवा सेनेतील ३०० कार्यकर्ते शिंदे गटात

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना

ला निनाच्या प्रभावामुळे यंदा मुंबईकर गारठणार

मुंबई : नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.

एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पुलाचे काम सुरू

मुंबई : १२५ वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाच्या जागी डबल-डेकर पूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. पुलाच्या दोन्ही

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च