Monday, September 15, 2025

नवरात्रीत उपवासा दरम्यान काय खावे ?

नवरात्रीत उपवासा दरम्यान काय खावे ?

नवरात्रीत सलग ९ दिवस उपवास करणे सोपे काम नाही आणि या काळात अनेक लोकांचे आरोग्य बिघडते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नवरात्रीत उपवास करताना लोकांनी त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे जेणेकरून ते कोणत्याही समस्येशिवाय ९ दिवस उपवास करू शकतील. उपवासाचे अनेक आरोग्य फायदे असू शकतात, परंतु या काळात खाण्याच्या सवयींबद्दल निष्काळजीपणा देखील समस्या निर्माण करू शकतो.

उपवासाच्या दिवशी, तुमच्या शरीराच्या नैसर्गिक शुद्धीकरण क्रियेला योग्यपणे पार पडण्यासाठी फळे, भाज्या आणि पाणी सेवन करण्याचे सुचवले जाते. लिंबू आणि मध पाणी यांसारखी पेये शुद्धीकरणात मदत करू शकतात, शरीर विषमुक्त होण्यास चालना देतात आणि त्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत मिळते. नवरात्रीच्या उपवासाचे धार्मिक परंपरेमध्ये एक महत्त्वाचे स्थान आहे ज्याचे अध्यात्मिक आणि शारीरिक कल्याणामध्ये महत्त्व दिसून येतात. पण जर तुम्हाला मधुमेह किंवा रक्तदाब तसेच इतर काही आजार असतील तर सावधगिरी बाळगा.

उपवासाच्या काळात तळलेले आणि तेलकट पदार्थ टाळावेत, त्याऐवजी साबुदाणा खिचडीसारखे आरोग्यदायी पदार्थ खावेत. शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतील याची काळजी देखील घ्यावी. उपवासाच्या काळात शरीरातील पाण्याचे प्रमाण राखण्यासाठी ताज्या फळांचा रस, नारळपाणी आणि हर्बल चहाचे सेवन करा. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही आणि हायड्रेशन चांगले राहील.

काय खावे :

फळे आणि भाज्या: फळे, बटाटे, रताळी, कच्चा भोपळा, गाजर, पालक, काकडी आणि लिंबू यांचा आहारात समावेश करू शकता.

धान्य: साबुदाणा आणि वरई खाऊ शकता, कारण ती पूर्णपणे ग्लुटेन-मुक्त असतात.

इतर पदार्थ: दूध, दही, पनीर, तूप आणि खवा यांसारखे दुग्धजन्य पदार्थ देखील खाऊ शकता.

उपवासात काय खाणे टाळावे :

धान्ये: गहू, तांदूळ यांसारखे पारंपरिक धान्य वर्ज्य करावे.

मसालेदार पदार्थ: मसालेदार अन्न खाऊ नये.

मांसहारी पदार्थ: मांस आणि मासे खाणे पूर्णपणे टाळावे.

इतर पदार्थ: गुटखा, पान, मद्य आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन करू नये.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा