Rain Update: पावसामुळे मोनो रेल बंद पडली, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी हे वाचून घ्या

मुंबई: मुंबई तसेच उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई तसेच उपनगरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरूवात झाली.

नोकरदारवर्गांनो जर तुम्ही कामासाठी घराबाहेर पडत असाल तर पावसाचा अंदाज बघूनच घराबाहेर पडा.सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. दादरच्या रेल्वे रुळांवर पाणी साचायला सुरूवात झाली आहे.

मोनो रेल वाहतुकीवर परिणाम


पावसामुळे मोनो रेलच्या वाहतुकीवर परिणाम झाला. वडाळा स्थानकादरम्यान, मोनोरेल बंद पडली. तांत्रिक कारणामुळे मुंबईतील मोनोरेल बंद झाली आहे. बंद पडलेल्या मोनोरेलमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

 


अनेक सखल भागांमध्ये पाणी


सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई तसेच उपनगरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे.

रेल्वे वाहतूक विस्कळीत

हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ५- १० मिनिटे उशिराने सुरू आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे
मध्य रेल्वेच्या गाड्या १०-१५ मिनिटे उशिराने सुरू आहेत.

मुंबईला पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट


मुंबईसाठी पुढील तीन तास अतिशय महत्त्वाचे आहेत. या ३ तासांसाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ड्रोन, फ्लाइंग कंदील उडविण्यास बंदी

मुंबई (वार्ताहर): दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतताभंग होऊ नये यासाठी पोलिसांनी

मेट्रो-५ साठी एमएमआरडीए २२ गाड्या खरेदी करणार

२ हजार ६४० कोटी रुपये खर्च मुंबई (प्रतिनिधी): 'ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो ५' मार्गिकेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास

मेट्रो-१ चा प्रवास घाट्याचा! उत्पन्न वाढीचा एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन तयार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील पहिली मेट्रो असलेली अंधेरी-घाटकोपर ही मेट्रो-१ मार्गिका घाट्यात चालत आहे. त्यातून

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना